शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीला उशीर'; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 10:30 IST

दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत...

पुणे : यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला विलंब लागल्याची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. पुढील वर्षात पथकांची संख्या कमी करता येईल का? किंवा पथकातील वादकांच्या संख्येबाबत मर्यादा असावी का? याचा विचार केला जाईल. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. पुढच्या वर्षीची मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी श्री कसबा गणपती मंडळाचे ऋग्वेद निरगुडकर, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, श्री केसरी वाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन उपस्थित होते.

लक्ष्मी रस्त्याने मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळली. या माध्यमातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपली असून, हा जय पराजय नाही, तर सक्षम व्यवस्थेवर विश्वास आहे, हे सिद्ध झाले आहे. मानाच्या गणपतींची मिरवणूक २४ तास चालते, या आरोपात तथ्य नाही. मानाचे गणपती इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देतात, पोलिसांवर दबाव आणतात या गोष्टींना कुठलाही आधार नाही. ऐन गणेशोत्सवात न्यायालयात खेटे मारणे हे कार्यकर्ता म्हणून दुर्दैवी आहे. याचिकाकर्त्या मंडळाने आम्हाला किंवा पोलीस प्रशासनाशी चर्चा केली नाही. आमच्या हातात थेट नोटिसा पडल्या. पुढील वर्षी परंपरा अबाधित ठेवून परिवर्तनाची कास धरण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भाविकांच्या भावना उत्स्फूर्त

यंदाच्या वर्षी मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल १० तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत चालल्याने विसर्जन सोहळा संपण्यास विलंब लागला. त्याविषयी बोलताना नितीन पंडित म्हणाले, यंदा मिरवणुकीला उशीर होण्यास अनेक कारणे आहेत. दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर उत्सव साजरा होत असल्याने भाविकांच्या भावना उत्स्फूर्त होत्या व मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी खूप असल्याने मिरवणुकीचा वेग मंदावला. मिरवणूक सुरळीत पार पाडणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली तरी आम्ही त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पुढील रूपरेषा ठरवणार आहोत.

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीGanesh Mahotsavगणेशोत्सव