शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले : डॉ.सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:13 AM

पुणे : ब्रिटिश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्यापूर्वी अनेक नेते होते. परंतु ...

पुणे : ब्रिटिश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्यापूर्वी अनेक नेते होते. परंतु ते ठरावीक भागापुरते मर्यादित होते. स्वातंत्र चळवळ उभी करताना उत्सवाचा उपयोग करता येईल, ही कल्पना त्यांना सुचली आणि गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. याच गणेशोत्सवातून स्वराज्याची प्रेरणा सामान्यांना मिळाली असून, राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ यांच्यातर्फे बाजीराव रस्त्यावरील वरदश्री सभागृह येथे विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, निवृत्त पोलीस अधिकारी मारुतीराव देशमुख, फाउंडेशनचे संस्थापक गणेश चव्हाण, पीयुष शाह, नितीन यंदे, अमर राव, भोला वांजळे, नरेंद्र व्यास आदी उपस्थित होते.

गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्थिर पाण्याचे हौद तसेच फिरत्या हौदांची तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करणाऱ्या आठ गणेशोत्सव मंडळांना विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, वाघजाई मित्र मंडळ फाउंडेशन जनता वसाहत, हिंदमाता तरुण मंडळ नाना पेठ, देशप्रेमी मित्र मंडळ कोथरूड, युगंधर मित्र मंडळ आनंदनगर, श्री रास्ता पेठ सार्वजनिक नायडू गणपती मंडळ, वंदे मातरम् मित्र मंडळ कसबा पेठ आणि गवळीवाडा श्री अरण्येश्वर मित्र मंडळ सहकार नगर या मंडळांचा उपरणे, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

गार्गी कोळपकर हिने गणेशवंदना नृत्य सादर केले. पीयुष शाह यांनी प्रास्ताविक केले. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.