शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गणेश मंडळांचा निर्धार : देखाव्यांचा खर्च केरळवासीयांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 01:55 IST

गृहोपयोगी वस्तूंचे किट तयार; सोसायटीधारकही सहभागी

पुणे : पुरामुळे केरळमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. केरळवासीयांना पुन्हा संसार उभा करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी सर्व स्तरांतून मदतीचा ओघ येत आहे. आता शहरातील नागरिक, सोसायट्या आणि गणेश मंडळांनीही त्यांना आर्थिक मदतीसोबतच संसारोपयोगी वस्तू देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी वस्तूंचे किट तयार केले जात असून, ते मंडळाचे कार्यकर्ते तेथे नेऊन देणार आहेत.

काही तरुणांनी एकत्र येऊन लव्ह केअर शेअर फाउंडेशनतर्फे यापूर्वीच केरळसाठी मदत पाठविली आहे. त्यानंतर तेथे दोन स्वयंसेवकही गेलेले आहेत. तेथील सर्व परिस्थिती त्यांनी पाहिली असून, अजून मदत लागणार असल्याचे जाणवले. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर केरळच्या मदतीसाठी गणेश मंडळेही येत आहेत. अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशनतर्फे अनेक गणेश मंडळांशी संपर्क साधला जात आहे. तसेच, सोसायटीधारकही मदतीसाठी पुढे आले आहेत. अनेक मंडळे त्यांचा देखाव्याचा खर्च आणि डीजेचा खर्च पूरग्रस्तांना देणार आहेत. तसेच विविध संस्थांनी या कामासाठी मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सध्या केरळमधील पाणी ओसरलेले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी अनेक वस्तू लागणार आहेत.त्या वस्तूंची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ब्रश, साबण, पीठ, तांदूळ, मसाला बॉक्स, किचन सेट, बेडशीट, टॉवेल आदी २७ वस्तूंचा समावेश आहे. तसेच, नागरिकांनी किंवा मंडळांनी खाद्यपदार्थ, औषधे, गृहोपयोगी वस्तू, कपडे अशा स्वरूपात मदत करावी, असे आवाहन केले आहे.

लव्ह केअर शेअर फाउंडेशनचे पीयूष शहा म्हणाले, ‘‘केरळमध्ये आम्ही यापूर्वी मदत पाठविली आहे. तसेच स्वयंसेवकही गेले आहेत.तेथे जाऊन त्यांनी आम्हाला अजून मदत लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही गणेश मंडळे, सोसायटीधारकांना आवाहन करीत आहोत, की त्यांनी अधिकाधिक मदत करावी. अनेक मंडळे देखाव्याचा खर्च कमी करून मदत करण्यासाठी सरसावली आहेत.’’दोनशे कुटुंबांकडे सामान पोहोचविणारएर्नाकुलम येथील कुटुंबांना काहीच मदत मिळालेली नाही. त्या ठिकाणी मदत पाठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तेथील सुमारे २०० कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे किट देण्यात येईल. एर्नाकुलम येथील चर्च अ‍ॅथॉरिटी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत, असेही पीयूष शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेKerala Floodsकेरळ पूर