शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मुक्त विहार करणारे चिऊ-काऊ पावसाळ्यात म्हणतात, ‘डू नाॅट डिस्टर्ब’

By प्रमोद सरवळे | Updated: July 16, 2022 11:08 IST

पावसाळ्यात बगळे कमी दिसतात कारण....

पुणे : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर शाळांना सुटी देण्यात आली; पण मग असा इशारा वगैरे काहीही नसताना पक्षी पावसाळ्यात जातात तरी कुठे? ते आकाशातून गायब कसे झाले? त्यांचे आवाज येतात; पण ते दिसत नाहीत. चिमण्या, कावळे, पोपट, कबुतरे करतात तरी काय पाऊस पडत असताना, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असल्याने ते ‘डू नाॅट डिस्टर्ब‘ असे म्हणत घरट्यातच राहणे पसंत करतात.

पावसाळा हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षी त्यांच्या सुरक्षित ठिकाणी किंवा घरट्यात थांबतात. पाऊस थांबला तर तेवढ्या वेळासाठी ते बाहेर पडतात. पावसामुळे त्यांच्या आसपासच त्यांना गवत, किडे, कीटक हे त्यांचे खाद्य उपलब्ध होते. पावसाचा अंदाज पक्ष्यांना आधीच येतो. त्यांच्या वर्तनावरून त्यामुळेच जुने लोक पावसाचा अंदाजही बांधत असत. तो बरेचदा अचूक यायचा.

पक्षितज्ज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या अगदी सुरुवातीला बरेचसे पक्षी अंडी घालतात. त्यासाठीचे घरटे पावसाळ्याआधीच तयार ठेवतात. ते सुरक्षित, पावसापासून बचाव होईल अशाच ठिकाणी असते. काही जातींच्या पक्ष्यांचा अपवादवगळला तर नर आणि मादी दोघेही या काळात घरट्यात असतात. अंडी व्यवस्थित उबवण्यासाठी गरम वातावरणाची गरज असते. पिलाच्या जन्मानंतरही नर आणि मादी दोघेही त्याचे पालनपोषण करतात. त्यामुळेच एरव्ही मुक्त दिसत असलेला पक्ष्यांचा संचार पावसाळ्यात कमी दिसतो.

काही गंमतीशीर गोष्टी

कमळ पक्षी - कमळ पक्ष्यात मुख्य दोन प्रजाती आढळतात. त्यामध्ये ब्राँझ विंग जकाना आणि थिसंट विंग जकाना आहेत. या पक्ष्यांचे विशेष म्हणजे त्यांचे घरटे फक्त कमळावरच असते. प्रजननानंतर ते या घरट्यातच असतात. वजनाने लहान व लांब पाय यामुळे त्याची पिले तिथे सुरक्षित राहू शकतात. गवताळ प्रदेशात यांची संख्या जास्त दिसते.

बगळे कमी दिसतात कारण -

पावसाळ्यात ब्रिडिंगचा काळ असल्याने देश आणि घाट परिसरातील बगळे कोकणात जातात. तिथेच त्यांचे प्रजनन होते. त्यामुळे इतरत्र बगळे कमी दिसत असले तरी या काळात त्यांची संख्या कोकणात एकदम वाढते.

प्रजनन काळात पक्ष्यांच्या, विशेषतः मादी पक्ष्याच्या वर्तनात बराच बदल होतो. शक्यतो ते उडण्याची म्हणजे कष्टाची कामे करत नाहीत. एकाच जागी बसून असतात. फार गरज असेल तरच उडतात.

- डॉ. सतीश पांडे (पक्षितज्ज्ञ)

पक्ष्यांचा अधिवास मुख्यत्वे गवताळ प्रदेश आणि जंगलात आढळतो. त्यामुळे गवताळ प्रदेश नष्ट न करता तो वाढवला पाहिजे. गवताळ प्रदेश टिकला तर जंगलांचे वाळवंटीकरण होणार नाही.

- अद्वैत चौधरी (पक्षितज्ज्ञ)

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रbirds sanctuaryपक्षी अभयारण्यpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडforestजंगल