शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

मुक्त विहार करणारे चिऊ-काऊ पावसाळ्यात म्हणतात, ‘डू नाॅट डिस्टर्ब’

By प्रमोद सरवळे | Updated: July 16, 2022 11:08 IST

पावसाळ्यात बगळे कमी दिसतात कारण....

पुणे : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर शाळांना सुटी देण्यात आली; पण मग असा इशारा वगैरे काहीही नसताना पक्षी पावसाळ्यात जातात तरी कुठे? ते आकाशातून गायब कसे झाले? त्यांचे आवाज येतात; पण ते दिसत नाहीत. चिमण्या, कावळे, पोपट, कबुतरे करतात तरी काय पाऊस पडत असताना, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असल्याने ते ‘डू नाॅट डिस्टर्ब‘ असे म्हणत घरट्यातच राहणे पसंत करतात.

पावसाळा हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षी त्यांच्या सुरक्षित ठिकाणी किंवा घरट्यात थांबतात. पाऊस थांबला तर तेवढ्या वेळासाठी ते बाहेर पडतात. पावसामुळे त्यांच्या आसपासच त्यांना गवत, किडे, कीटक हे त्यांचे खाद्य उपलब्ध होते. पावसाचा अंदाज पक्ष्यांना आधीच येतो. त्यांच्या वर्तनावरून त्यामुळेच जुने लोक पावसाचा अंदाजही बांधत असत. तो बरेचदा अचूक यायचा.

पक्षितज्ज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या अगदी सुरुवातीला बरेचसे पक्षी अंडी घालतात. त्यासाठीचे घरटे पावसाळ्याआधीच तयार ठेवतात. ते सुरक्षित, पावसापासून बचाव होईल अशाच ठिकाणी असते. काही जातींच्या पक्ष्यांचा अपवादवगळला तर नर आणि मादी दोघेही या काळात घरट्यात असतात. अंडी व्यवस्थित उबवण्यासाठी गरम वातावरणाची गरज असते. पिलाच्या जन्मानंतरही नर आणि मादी दोघेही त्याचे पालनपोषण करतात. त्यामुळेच एरव्ही मुक्त दिसत असलेला पक्ष्यांचा संचार पावसाळ्यात कमी दिसतो.

काही गंमतीशीर गोष्टी

कमळ पक्षी - कमळ पक्ष्यात मुख्य दोन प्रजाती आढळतात. त्यामध्ये ब्राँझ विंग जकाना आणि थिसंट विंग जकाना आहेत. या पक्ष्यांचे विशेष म्हणजे त्यांचे घरटे फक्त कमळावरच असते. प्रजननानंतर ते या घरट्यातच असतात. वजनाने लहान व लांब पाय यामुळे त्याची पिले तिथे सुरक्षित राहू शकतात. गवताळ प्रदेशात यांची संख्या जास्त दिसते.

बगळे कमी दिसतात कारण -

पावसाळ्यात ब्रिडिंगचा काळ असल्याने देश आणि घाट परिसरातील बगळे कोकणात जातात. तिथेच त्यांचे प्रजनन होते. त्यामुळे इतरत्र बगळे कमी दिसत असले तरी या काळात त्यांची संख्या कोकणात एकदम वाढते.

प्रजनन काळात पक्ष्यांच्या, विशेषतः मादी पक्ष्याच्या वर्तनात बराच बदल होतो. शक्यतो ते उडण्याची म्हणजे कष्टाची कामे करत नाहीत. एकाच जागी बसून असतात. फार गरज असेल तरच उडतात.

- डॉ. सतीश पांडे (पक्षितज्ज्ञ)

पक्ष्यांचा अधिवास मुख्यत्वे गवताळ प्रदेश आणि जंगलात आढळतो. त्यामुळे गवताळ प्रदेश नष्ट न करता तो वाढवला पाहिजे. गवताळ प्रदेश टिकला तर जंगलांचे वाळवंटीकरण होणार नाही.

- अद्वैत चौधरी (पक्षितज्ज्ञ)

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रbirds sanctuaryपक्षी अभयारण्यpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडforestजंगल