शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विहार करणारे चिऊ-काऊ पावसाळ्यात म्हणतात, ‘डू नाॅट डिस्टर्ब’

By प्रमोद सरवळे | Updated: July 16, 2022 11:08 IST

पावसाळ्यात बगळे कमी दिसतात कारण....

पुणे : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर शाळांना सुटी देण्यात आली; पण मग असा इशारा वगैरे काहीही नसताना पक्षी पावसाळ्यात जातात तरी कुठे? ते आकाशातून गायब कसे झाले? त्यांचे आवाज येतात; पण ते दिसत नाहीत. चिमण्या, कावळे, पोपट, कबुतरे करतात तरी काय पाऊस पडत असताना, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असल्याने ते ‘डू नाॅट डिस्टर्ब‘ असे म्हणत घरट्यातच राहणे पसंत करतात.

पावसाळा हा पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षी त्यांच्या सुरक्षित ठिकाणी किंवा घरट्यात थांबतात. पाऊस थांबला तर तेवढ्या वेळासाठी ते बाहेर पडतात. पावसामुळे त्यांच्या आसपासच त्यांना गवत, किडे, कीटक हे त्यांचे खाद्य उपलब्ध होते. पावसाचा अंदाज पक्ष्यांना आधीच येतो. त्यांच्या वर्तनावरून त्यामुळेच जुने लोक पावसाचा अंदाजही बांधत असत. तो बरेचदा अचूक यायचा.

पक्षितज्ज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या अगदी सुरुवातीला बरेचसे पक्षी अंडी घालतात. त्यासाठीचे घरटे पावसाळ्याआधीच तयार ठेवतात. ते सुरक्षित, पावसापासून बचाव होईल अशाच ठिकाणी असते. काही जातींच्या पक्ष्यांचा अपवादवगळला तर नर आणि मादी दोघेही या काळात घरट्यात असतात. अंडी व्यवस्थित उबवण्यासाठी गरम वातावरणाची गरज असते. पिलाच्या जन्मानंतरही नर आणि मादी दोघेही त्याचे पालनपोषण करतात. त्यामुळेच एरव्ही मुक्त दिसत असलेला पक्ष्यांचा संचार पावसाळ्यात कमी दिसतो.

काही गंमतीशीर गोष्टी

कमळ पक्षी - कमळ पक्ष्यात मुख्य दोन प्रजाती आढळतात. त्यामध्ये ब्राँझ विंग जकाना आणि थिसंट विंग जकाना आहेत. या पक्ष्यांचे विशेष म्हणजे त्यांचे घरटे फक्त कमळावरच असते. प्रजननानंतर ते या घरट्यातच असतात. वजनाने लहान व लांब पाय यामुळे त्याची पिले तिथे सुरक्षित राहू शकतात. गवताळ प्रदेशात यांची संख्या जास्त दिसते.

बगळे कमी दिसतात कारण -

पावसाळ्यात ब्रिडिंगचा काळ असल्याने देश आणि घाट परिसरातील बगळे कोकणात जातात. तिथेच त्यांचे प्रजनन होते. त्यामुळे इतरत्र बगळे कमी दिसत असले तरी या काळात त्यांची संख्या कोकणात एकदम वाढते.

प्रजनन काळात पक्ष्यांच्या, विशेषतः मादी पक्ष्याच्या वर्तनात बराच बदल होतो. शक्यतो ते उडण्याची म्हणजे कष्टाची कामे करत नाहीत. एकाच जागी बसून असतात. फार गरज असेल तरच उडतात.

- डॉ. सतीश पांडे (पक्षितज्ज्ञ)

पक्ष्यांचा अधिवास मुख्यत्वे गवताळ प्रदेश आणि जंगलात आढळतो. त्यामुळे गवताळ प्रदेश नष्ट न करता तो वाढवला पाहिजे. गवताळ प्रदेश टिकला तर जंगलांचे वाळवंटीकरण होणार नाही.

- अद्वैत चौधरी (पक्षितज्ज्ञ)

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रbirds sanctuaryपक्षी अभयारण्यpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडforestजंगल