शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अपघात दाव्यातून उघड झाली विमा कंपनीची फसवणूक; लष्कर पोलिसांकडे फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:00 IST

दोघांना बनावट पॉलिसी काढून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा़ कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आरोरा टॉवरला कार्यालय आहे़, २०१२ मध्ये घडला होता प्रकारकंपनीने कागदपत्रे पडताळणी केली, त्यानंतर पॉलिसी बनावट असल्याचे झाले़ निष्पन्न

पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील मोटार अपघात दाव्यातील एका प्रकरणाची कागदपत्रे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आली़ त्यातील पॉलिसी पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले़ त्यानंतर कंपनीच्या वतीने बनावट पॉलिसी काढून देऊन फसवूणक करण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे़ आतापर्यंत दोघांना बनावट पॉलिसी काढून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे़ याप्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा़ कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आरोरा टॉवरला कार्यालय आहे़ हा प्रकार २०१२ मध्ये घडला होता़ याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर येथील मोटार अपघात न्यायालयात एक दावा दाखल करण्यात आला आहे़ त्यातील क्लेमबाबत दाखल करण्यात आलेल्या विमा पॉलिसीची कागदपत्रे कंपनीला मिळाली़ कंपनीने त्याची पडताळणी केली, तर ती पॉलिसी बनावट असल्याचे निष्पन्न झाले़ बाबासाहेब महादेव कुदळे यांना एकाने फोन करून पॉलिसी उतरून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना बनावट पॉलिसी काढून दिली होती़  पैगंबर इस्माइल शेख हे आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आले होते़ त्यांनाही बनावट पॉलिसी दिल्याचे उघड झाले़ त्यानंतर कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत़  

टॅग्स :Puneपुणे