शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

किल्ले पुरंदर व परिसरातील स्मृतीस्थळ पर्यटन म्हणून विकसित होणार -आमदार संजय जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST

सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ...

सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून किल्ले विकास व किल्ले पायथा व ५० किलोमीटर परिसरातील पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे जाहीर केले असून, यामध्ये पुरंदर किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी केली. यावेळी त्यांनी आमदार फंडातून २५ लाख रुपयांची घोषणाही केली.

भिवडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३० व्या शासकीय जयंतीनिमित्त स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, तहसीलदार रुपाली सरनोबत, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी अमर माने, उमाजी नाईक यांचे वंशज रमण खोमणे आणि चंद्रकांत खोमणे, मोहन नाना मदने, सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच राहुल मोकाशी, रामदास धनवटे, विठ्ठल मोकाशी, साहेबराव जाधव, भैया खोमणे, बाळासाहेब भिंताडे, साधू दिघे, दिलीप वांढेकर, त्याच प्रमाणे राज्याच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, परिसरातील सर्व गावांचा कायापालट होणार असून, या गावांचा इतिहास जतन केले जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जन्मस्थाने एकाच परिसरात असल्याने या स्मृतीस्थळांचा विकास पर्यटन म्हणून केला जाणार आहे. असे सांगतानाच उमाजी नाईक यांचे समाधी स्थान नगरपालिकेने विकसित करण्याचे जाहीर केले आहे. त्याच प्रमाणे स्मारकाच्या विकासासाठी आमदार फंडातून २५ लाख रुपयांची घोषणा करून त्यातून त्यांचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून समाजासमोर आणला जाईल.

--

फोटो क्रमांक : ०८सासवड किल्ले पुरंदर स्मृतीस्थळ

फोटो ओळ ; भिवडी ( ता. पुरंदर ) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित ग्रामस्थ.

080921\img-20210907-wa0017.jpg

फोटो ओळ ; भिवडी ( ता. पुरंदर ) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.