शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 14:02 IST

हल्ल्यांचे वाढते प्रमाण

ठळक मुद्देउपचारानंतर जंगलात सोडण्यापूर्वी जीपीएस यंत्रणा बसविण्याची गरज काळानुसार वाघांची व इतर श्वापदांची संख्या नगण्यबिबट्यांच्या संख्येत मात्र वाढजमिनीचे भाव गगनाला भिडले; त्यामुळे वृक्षतोड होऊन घरांची निर्मिती वाढली, जंगलक्षेत्र घटले

राजुरी : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, तालुक्यात नेमके किती बिबटे आहेत, याचा अंदाज खुद्द वन खात्यालाही नाही. ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदे गावालगत येत असत; परंतु त्यांचा वावर हा शक्यतो डोंगरातील गुहा, कपारी यांमध्ये असे. तत्कालीन जंगलांची मुबलकता, जंगलात भक्ष्याची मुबलकता यांमुळे ही श्वापदे मानवी वस्तीपर्यंत येत नव्हती. काळानुसार वाघांची व इतर श्वापदांची संख्या नगण्य झाली; परंतु बिबट्यांच्या संख्येत मात्र वाढच होत गेली. जमिनीचे भाव गगनाला भिडले; त्यामुळे वृक्षतोड होऊन घरांची निर्मिती वाढली, जंगलक्षेत्र घटले. जंगलांना लागलेल्या वणव्यांमुळे जंगलात मिळणारी शिकार कमी झाली. जुन्नर तालुक्यातील येडगाव, पिंपळगाव जोगा, वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी या पाच धरणांमुळे जमिनी, जंगले व गावे बुडाली. माणसांचा व पाळीव जनावरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने काही प्रमाणात सोडवला; परंतु जंगली श्वापदांचा विचार झाला नाही.जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांचा बोजवारा उडाला. दुसरीकडे, पाच धरणे आणि कालव्यांचे जाळे यामुळे जमिनी ओलिताखाली आल्या. साखर कारखानदारीमुळे शेतकरी कमी श्रमाच्या ऊसशेतीकडे वळला. सैरभैर झालेल्या बिबट्यांना मानवनिर्मित वस्तीस्थान तयार झाले आणि त्यांचा मानवी वसाहतीजवळचा वावर वाढू लागला.ऊसशेतीजवळ असणाºया पाळीव जनावरांवर बिबट्याचा उदरनिर्वाह होऊ लागला. परंतु, पाळीव जनावरे बंदिस्त होऊ लागल्याने एकट्या-दुकट्या व्यक्ती, लहान मुले, शाळेत ये-जा करणारा विद्यार्थिवर्ग, शेतात काम करणारा महिलावर्ग यांच्यावर हल्ले वाढले. गेल्या १६ वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात जवळजवळ तीन हजार पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. सुमारे दोनशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आतापर्यंत २८ ते ३० व्यक्तींचे बळी गेले. नव्वद ते शंभराहून अधिक जखमी झाले. वन खात्याने १३५हून अधिक बिबटे पकडून काहींना उपचार करून पुन्हा सोडून दिले. तीस बिबटे जुन्नर येथील माणिकडोह निवारा केंद्रात आहेत.बिबट्या पकडल्यानंतर त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यापूर्वी त्याच्यावर जीपीआरएस यंत्रणा बसवण्याची गरज आहे. परदेशात या पद्धतीचा अवलंब केला जातो. जीपीआरएस यंत्रणा बसविल्यास प्रत्येक बिबट्याचा निश्चित ठावठिकाणा समजण्यास मदत होईल, बिबट्यांची संख्या निश्चितपणे कळण्यास मदत होईल. मात्र, आधुनिक पद्धतीकडे ना शासनाचे लक्ष आहे, ना वन विभागाचे! काही लोकांच्या मतानुसार बिबट्याचे संपूर्ण उच्चाटन करून टाकणे, हा उपाय सांगितला जातो. मात्र, हे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर, असा प्रकार आहे. .......जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनांचे प्रमाण खूपच कमी झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. जंगलाचे प्रमाण वाढविण्याठी झाडे लावण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांच्या पाळीव प्राण्यांना बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे, अशा शेतकºयांना लवकर भरपाई मिळण्याची गरज आहे. - वल्लभ शेळके,सामाजिक कार्यकर्ते ............तालुक्यात सध्या बिबट्याचे अनेक ठिकाणी हल्ले वाढले आहेत. जंगलाचे प्रमाण कमी झाल्याचा हा परिणाम आहे. जास्तीत जास्त झाडे लावल्यास हा धोका टाळता येईल. बिबट्यांना पकडण्यासाठी जादा व आधुनिक पद्धतीचे पिंजरे मागवले आहेत.  - जयराम गवडा,सहायक वनरक्षक,जुन्नर....बिबट्या लोकांच्या नजरेस पडावा, यासाठी रात्रीचे वीजभारनियमन बंद करावे. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडे असलेले पिंजरे अतिशय जुन्या पद्धतीचे आहेत. वन खात्याने आधुनिक पद्धतीचे पिंजरे मागावेत- जानकू डावखर, अध्यक्ष, मुक्ताई देवस्थान ट्रस्ट, बेल्हे 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागGovernmentसरकार