शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 14:02 IST

हल्ल्यांचे वाढते प्रमाण

ठळक मुद्देउपचारानंतर जंगलात सोडण्यापूर्वी जीपीएस यंत्रणा बसविण्याची गरज काळानुसार वाघांची व इतर श्वापदांची संख्या नगण्यबिबट्यांच्या संख्येत मात्र वाढजमिनीचे भाव गगनाला भिडले; त्यामुळे वृक्षतोड होऊन घरांची निर्मिती वाढली, जंगलक्षेत्र घटले

राजुरी : जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, तालुक्यात नेमके किती बिबटे आहेत, याचा अंदाज खुद्द वन खात्यालाही नाही. ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी वाघ, बिबट्या, लांडगे, तरस ही जंगली श्वापदे गावालगत येत असत; परंतु त्यांचा वावर हा शक्यतो डोंगरातील गुहा, कपारी यांमध्ये असे. तत्कालीन जंगलांची मुबलकता, जंगलात भक्ष्याची मुबलकता यांमुळे ही श्वापदे मानवी वस्तीपर्यंत येत नव्हती. काळानुसार वाघांची व इतर श्वापदांची संख्या नगण्य झाली; परंतु बिबट्यांच्या संख्येत मात्र वाढच होत गेली. जमिनीचे भाव गगनाला भिडले; त्यामुळे वृक्षतोड होऊन घरांची निर्मिती वाढली, जंगलक्षेत्र घटले. जंगलांना लागलेल्या वणव्यांमुळे जंगलात मिळणारी शिकार कमी झाली. जुन्नर तालुक्यातील येडगाव, पिंपळगाव जोगा, वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी या पाच धरणांमुळे जमिनी, जंगले व गावे बुडाली. माणसांचा व पाळीव जनावरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने काही प्रमाणात सोडवला; परंतु जंगली श्वापदांचा विचार झाला नाही.जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांचा बोजवारा उडाला. दुसरीकडे, पाच धरणे आणि कालव्यांचे जाळे यामुळे जमिनी ओलिताखाली आल्या. साखर कारखानदारीमुळे शेतकरी कमी श्रमाच्या ऊसशेतीकडे वळला. सैरभैर झालेल्या बिबट्यांना मानवनिर्मित वस्तीस्थान तयार झाले आणि त्यांचा मानवी वसाहतीजवळचा वावर वाढू लागला.ऊसशेतीजवळ असणाºया पाळीव जनावरांवर बिबट्याचा उदरनिर्वाह होऊ लागला. परंतु, पाळीव जनावरे बंदिस्त होऊ लागल्याने एकट्या-दुकट्या व्यक्ती, लहान मुले, शाळेत ये-जा करणारा विद्यार्थिवर्ग, शेतात काम करणारा महिलावर्ग यांच्यावर हल्ले वाढले. गेल्या १६ वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात जवळजवळ तीन हजार पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. सुमारे दोनशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले. आतापर्यंत २८ ते ३० व्यक्तींचे बळी गेले. नव्वद ते शंभराहून अधिक जखमी झाले. वन खात्याने १३५हून अधिक बिबटे पकडून काहींना उपचार करून पुन्हा सोडून दिले. तीस बिबटे जुन्नर येथील माणिकडोह निवारा केंद्रात आहेत.बिबट्या पकडल्यानंतर त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यापूर्वी त्याच्यावर जीपीआरएस यंत्रणा बसवण्याची गरज आहे. परदेशात या पद्धतीचा अवलंब केला जातो. जीपीआरएस यंत्रणा बसविल्यास प्रत्येक बिबट्याचा निश्चित ठावठिकाणा समजण्यास मदत होईल, बिबट्यांची संख्या निश्चितपणे कळण्यास मदत होईल. मात्र, आधुनिक पद्धतीकडे ना शासनाचे लक्ष आहे, ना वन विभागाचे! काही लोकांच्या मतानुसार बिबट्याचे संपूर्ण उच्चाटन करून टाकणे, हा उपाय सांगितला जातो. मात्र, हे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर, असा प्रकार आहे. .......जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनांचे प्रमाण खूपच कमी झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. जंगलाचे प्रमाण वाढविण्याठी झाडे लावण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांच्या पाळीव प्राण्यांना बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे, अशा शेतकºयांना लवकर भरपाई मिळण्याची गरज आहे. - वल्लभ शेळके,सामाजिक कार्यकर्ते ............तालुक्यात सध्या बिबट्याचे अनेक ठिकाणी हल्ले वाढले आहेत. जंगलाचे प्रमाण कमी झाल्याचा हा परिणाम आहे. जास्तीत जास्त झाडे लावल्यास हा धोका टाळता येईल. बिबट्यांना पकडण्यासाठी जादा व आधुनिक पद्धतीचे पिंजरे मागवले आहेत.  - जयराम गवडा,सहायक वनरक्षक,जुन्नर....बिबट्या लोकांच्या नजरेस पडावा, यासाठी रात्रीचे वीजभारनियमन बंद करावे. बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडे असलेले पिंजरे अतिशय जुन्या पद्धतीचे आहेत. वन खात्याने आधुनिक पद्धतीचे पिंजरे मागावेत- जानकू डावखर, अध्यक्ष, मुक्ताई देवस्थान ट्रस्ट, बेल्हे 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागGovernmentसरकार