शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'वनविभाग झोपला अन् बिबट्या मात्र जागा', भविष्यात पुण्यात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:44 IST

वन्यजीव धोरण कधी होणार, वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजना काय करणार ?

श्रीकिशन काळे 

पुणे : बिबट्यांचा अधिवास नसताना ते उसामध्ये आता चांगले स्थिरावले आहेत. उसाची शेती वाढतेय तशी बिबट्यांची संख्याही वाढली आहे. आता तर पुणे शहराकडे बिबट्याने मोर्चा वळवला आहे. अशा वेळी मानव - बिबट संघर्ष अटळ आहे. बिबट्यांच्या संख्येवर आणि हल्ल्यांवर वन विभाग काहीच उपाय करत नाहीत. त्यासाठीचा आराखडाच तयार केलेला नाही. कारण वन विभाग झोपलेला आहे आणि बिबट्या मात्र जागा आहे. 

नैसर्गिक अधिवासातून बिबट्याने कधीच पळ काढून उसाची शेती आता अधिवास केला आहे. एका वेळी तीन - तीन बछडे जन्माला येत असल्याने त्यावर नियंत्रणच नाही. फुरसुंगी परिसरात, दिवे घाटात येणारा बिबट्या आता साडेसतरा नळी म्हणजे खूप दाट वस्ती असलेल्या भागात शिरकाव करत आहे. आताच योग्य धोरण ठरवले नाही, तर भविष्यात शहरात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार आहे. माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर म्हणाले, गेली अनेक वर्षे झाली, वन्यजीव धोरणाची मागणी केली जात आहे. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या बिबट्यांचा वावर सोलापूर, बार्शी, बीड, उस्मानाबाद परिसरातही होत आहे. कारण उसाची शेती वाढली आणि त्यात बिबट्यांची संख्याही वाढत आहे. हे रोखायचे असेल तर ठोस धोरण हवे.''

गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक 

''शहराभोवती लोकं कचरा टाकतात. त्याने कुत्री, डुक्करं वाढतात आणि याकडे बिबटे आकर्षित होतात. म्हणून ते शहरालगतच्या परिसरात शिरकाव करत आहेत. गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा बिबट्यांचे हल्ले वाढतच जातील. बिबटे नैसर्गिक अधिवास सोडून इतर ठिकाणी दिसले तर काय करायचे याचे धोरण नक्की हवे. अधिवासात नसतील तर तिथे त्यांना मारायचे की, पकडायचे यावर ठोस निर्णय व्हायला हवा असे माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर यांनी सांगितले.'' 

बिबटे नसबंदीचे झाले काय?

काही वर्षांपुर्वी बिबट्यांची नसबंदी करण्याची घोषणा मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केली होती. परंतु त्यानंतर यावर काहीच घडामोड झाली नाही. केवळ तात्पुरती घोषणा करून वन विभाग गप्प बसले आहे. वन विभागाकडून बिबट-मानव संघर्षावर ठोस काही तरी काम व्हायला हवे. अन्यथा आज नागरिकांचा हात जखमी झाला आहे, उद्या जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल ? 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागPoliceपोलिस