शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

'वनविभाग झोपला अन् बिबट्या मात्र जागा', भविष्यात पुण्यात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:44 IST

वन्यजीव धोरण कधी होणार, वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजना काय करणार ?

श्रीकिशन काळे 

पुणे : बिबट्यांचा अधिवास नसताना ते उसामध्ये आता चांगले स्थिरावले आहेत. उसाची शेती वाढतेय तशी बिबट्यांची संख्याही वाढली आहे. आता तर पुणे शहराकडे बिबट्याने मोर्चा वळवला आहे. अशा वेळी मानव - बिबट संघर्ष अटळ आहे. बिबट्यांच्या संख्येवर आणि हल्ल्यांवर वन विभाग काहीच उपाय करत नाहीत. त्यासाठीचा आराखडाच तयार केलेला नाही. कारण वन विभाग झोपलेला आहे आणि बिबट्या मात्र जागा आहे. 

नैसर्गिक अधिवासातून बिबट्याने कधीच पळ काढून उसाची शेती आता अधिवास केला आहे. एका वेळी तीन - तीन बछडे जन्माला येत असल्याने त्यावर नियंत्रणच नाही. फुरसुंगी परिसरात, दिवे घाटात येणारा बिबट्या आता साडेसतरा नळी म्हणजे खूप दाट वस्ती असलेल्या भागात शिरकाव करत आहे. आताच योग्य धोरण ठरवले नाही, तर भविष्यात शहरात बिबट्यांचा धुमाकूळ माजणार आहे. माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर म्हणाले, गेली अनेक वर्षे झाली, वन्यजीव धोरणाची मागणी केली जात आहे. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या बिबट्यांचा वावर सोलापूर, बार्शी, बीड, उस्मानाबाद परिसरातही होत आहे. कारण उसाची शेती वाढली आणि त्यात बिबट्यांची संख्याही वाढत आहे. हे रोखायचे असेल तर ठोस धोरण हवे.''

गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक 

''शहराभोवती लोकं कचरा टाकतात. त्याने कुत्री, डुक्करं वाढतात आणि याकडे बिबटे आकर्षित होतात. म्हणून ते शहरालगतच्या परिसरात शिरकाव करत आहेत. गावांभोवती स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा बिबट्यांचे हल्ले वाढतच जातील. बिबटे नैसर्गिक अधिवास सोडून इतर ठिकाणी दिसले तर काय करायचे याचे धोरण नक्की हवे. अधिवासात नसतील तर तिथे त्यांना मारायचे की, पकडायचे यावर ठोस निर्णय व्हायला हवा असे माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोळकर यांनी सांगितले.'' 

बिबटे नसबंदीचे झाले काय?

काही वर्षांपुर्वी बिबट्यांची नसबंदी करण्याची घोषणा मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केली होती. परंतु त्यानंतर यावर काहीच घडामोड झाली नाही. केवळ तात्पुरती घोषणा करून वन विभाग गप्प बसले आहे. वन विभागाकडून बिबट-मानव संघर्षावर ठोस काही तरी काम व्हायला हवे. अन्यथा आज नागरिकांचा हात जखमी झाला आहे, उद्या जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असेल ? 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागPoliceपोलिस