शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Somvar 2022: श्रावणी सोमवारचे उपवास करताय तर 'हे' पाळाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:00 IST

या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?

पिंपरी : उपवास करणं केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर शरीरासाठीही चांगले मानले जाते. उपवासामुळे शरीराची पचनक्रिया अधिक चांगली होते आणि चयापचय गती वाढते. मात्र, या काळात काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो.

श्रावण महिन्यात भगवान शंकराचा दिवस मानल्या जाणाऱ्या सोमवारचे व्रत आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही श्रावण सोमवारचे उपवास करणार असाल तर उपवासाच्या वेळी कसे निरोगी राहायचे ते सांगणार आहोत.

उपवास करताना या गोष्टींची काळजी घ्या

१) उपवासात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. दररोज ६-८ ग्लास पाणी प्या.

२) अशा फळांचा आहारात समावेश करा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल, जसे की द्राक्षे, लिची, संत्री, मोसंबी इ.

३) रिकाम्या पोटी ॲसिडिटी वाढू शकते, त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने काही फळे खात राहा.

४) तुम्ही सुकामेवा खाऊ शकता, यामुळे आवश्यक ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही.

५) न्याहारीसाठी, तुम्ही दुधासह फळे घेऊ शकता किंवा दुधात भिजवलेले बदाम खाऊ शकता.

६) दुपारच्या जेवणात साबुदाण्याच्या कोणत्याही पदार्थासह दही घेऊ शकता किंवा तुम्ही शिंगाड्याचे पीठ आणि बटाट्यापासून बनवलेल्या पुरीबरोबर दही घेऊ शकता.

७) उपवासाच्या दिवशी सकाळी तुम्ही दूध पिऊ शकता, दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ खाऊ शकता.

८) संध्याकाळी साध्या चहासोबत उपवासाचे चिप्स, भाजलेले मखाने किंवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकता.

९. ताज्या फळांचा रस घ्या.

या गोष्टी टाळा

१) उपवासाला जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढेल. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सर्व आवश्यक पोषक घटक खा.

२) शिंगाड्याचे पीठ आणि बटाटे जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

३) उपवासादरम्यान सुस्ती टाळण्यासाठी पनीर आणि फुल क्रीम दूध टाळा.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShravan Specialश्रावण स्पेशल