शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Shravan Somvar 2022: श्रावणी सोमवारचे उपवास करताय तर 'हे' पाळाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 12:00 IST

या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?

पिंपरी : उपवास करणं केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर शरीरासाठीही चांगले मानले जाते. उपवासामुळे शरीराची पचनक्रिया अधिक चांगली होते आणि चयापचय गती वाढते. मात्र, या काळात काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो.

श्रावण महिन्यात भगवान शंकराचा दिवस मानल्या जाणाऱ्या सोमवारचे व्रत आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही श्रावण सोमवारचे उपवास करणार असाल तर उपवासाच्या वेळी कसे निरोगी राहायचे ते सांगणार आहोत.

उपवास करताना या गोष्टींची काळजी घ्या

१) उपवासात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. दररोज ६-८ ग्लास पाणी प्या.

२) अशा फळांचा आहारात समावेश करा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल, जसे की द्राक्षे, लिची, संत्री, मोसंबी इ.

३) रिकाम्या पोटी ॲसिडिटी वाढू शकते, त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने काही फळे खात राहा.

४) तुम्ही सुकामेवा खाऊ शकता, यामुळे आवश्यक ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही.

५) न्याहारीसाठी, तुम्ही दुधासह फळे घेऊ शकता किंवा दुधात भिजवलेले बदाम खाऊ शकता.

६) दुपारच्या जेवणात साबुदाण्याच्या कोणत्याही पदार्थासह दही घेऊ शकता किंवा तुम्ही शिंगाड्याचे पीठ आणि बटाट्यापासून बनवलेल्या पुरीबरोबर दही घेऊ शकता.

७) उपवासाच्या दिवशी सकाळी तुम्ही दूध पिऊ शकता, दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ खाऊ शकता.

८) संध्याकाळी साध्या चहासोबत उपवासाचे चिप्स, भाजलेले मखाने किंवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकता.

९. ताज्या फळांचा रस घ्या.

या गोष्टी टाळा

१) उपवासाला जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढेल. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सर्व आवश्यक पोषक घटक खा.

२) शिंगाड्याचे पीठ आणि बटाटे जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

३) उपवासादरम्यान सुस्ती टाळण्यासाठी पनीर आणि फुल क्रीम दूध टाळा.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShravan Specialश्रावण स्पेशल