शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

‘पिलिग्रिम्स इन द डिजिटल वर्ल्ड’मधून सायबर हल्ल्यावर टाकला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:57 AM

पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘डेटा सिक्युरिटी’ हा सर्वांत सायबर हल्ल्यावरील परिणामकारक उपायन्यायप्रक्रियेशी संबंधित यंत्रणेपासून पोलीस यंत्रणेपर्यंत प्रशिक्षणाची आवश्यकता : संजय बहल

पुणे : पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत भारतीय संगणक प्रणाली आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले. माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ संदीप गोडबोले लिखित ‘पिलिग्रिम्स इन द डिजिटल वर्ल्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन बहल यांच्या हस्ते झाले. या वेळी टाटा कन्सल्टन्सीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सचिन लोढा आणि अदिती गोडबोले उपस्थित होते. बहल म्हणाले की, ‘दहशतवादाचा नवीन चेहरा सायबर हल्ल्यामार्फत जगापुढे आला आहे. संपूर्ण जग या अंतर्गत हल्ल्याच्या बचावासाठी यंत्रणा उभी करण्यात गुंतली आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या धोरणांवर आणि प्रयत्नांवर या हल्ल्याद्वारे नुकसान पोहोचवले जाते. हा मार्ग दहशतवाद्यांनादेखील सोयीचा असल्याने सायबर हल्ल्यांपासून देशाचा डेटा वाचविणे जिकिरीचे झाले आहे. डिजिटल समाज निर्मितीच्या ध्यासापोटी आपण आपली सुरक्षा धोक्यात तर आणत नाही ना, हे पाहणे गरजेचे ठरते. न्यायप्रक्रियेशी संबंधित यंत्रणेपासून गुन्ह्याच्या शोधात गुंतलेल्या पोलीस यंत्रणेपर्यंत सर्वच स्तरावर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सायबर हल्ल्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्की कोणत्या प्रकारचे पुरावे सादर करणे अपेक्षित आहे, या मूलभूत मुद्द्यापासून त्या प्रशिक्षणाचा प्रारंभ करावा लागेल.’ संदीप गोडबोले यांनी पुस्तकामागील भूमिका सांगितली.

टॅग्स :digitalडिजिटल