शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

पाच दिवसांचा आठवडा, तरी कामे उरकेना; जिल्हा परिषदेत वारंवार हेलपाटे मारून नागरिक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:26 IST

आपली कामे आज होईल, या आशेने ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र हेळसांड होत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत आहे

पुणे : प्रशासकीय कार्यालयतील कामे वेगवान व्हावी, या हेतूने पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला. या सोबतच कार्यालयीन कामांची वेळ वाढवण्यात आली. मात्र, असे असतानाही आपली कामे आज होईल, या आशेने ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र हेळसांड होत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत आहे. कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे येथे येणाऱ्या नागरिकांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत सोमवार आणि गुरुवार हा दिवस ग्रामीण भागातून येणारे नागरिक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या दिवसांत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. अनेक सर्वसामान्य नागरिक या दिवशी आपली कामे घेऊन मुख्यालयात येत असतात. आपली कामे आज तरी होतील या आशेने नागरिक असतात. मात्र, या नागरिकांची निराशा होत आहे. कागदपत्रांची अडचण किंवा कारकुनांच्या विविध कारणांमुळे कामे रखडत असल्याने नागरिक माघारी जात आहे.

जिल्हा परिषद, पुणे

वेळ सकाळी ९.३० 

जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची वेळ ही ९.३० ते ६.३० आहे. ९.३० वाजता सर्व कर्मचारी कार्यालयात येणे अपेक्षित असताना १० ते १०. १५ पर्यंत कर्मचारी कार्यालयात येतात. सोमवारी सकाळी जवळपास ७५ टक्के कर्मचारी १० पर्यंत कामावर उपस्थित होते.

वेळ ६.१५ ची

६ वाजले की कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची चाहूल लागते. ६.१५ मिनिटाला प्रत्येक विभाग हा ओस पडायला सुरुवात होते. काही मोजकेच कर्मचारी या वेळेला उपस्थित राहतात. इतर कर्मचारी मात्र घरी जाण्यास निघाल्याचे चित्र होते.

दोन आठवड्यांपासून येतोय काम होईना

ग्रामपंचायतीत जागेच्या कामामुळे मी गेल्या दोन आठवड्यांपासून मुख्यालयात येत आहे. मात्र, अद्यापही माझ्या कामाचा निपटारा झालेला नाही. आज या.. उद्या या.. अशा प्रकारची उत्तरे मिळत आहे, असे एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. गावातील रस्त्यांच्या कामासंदर्भात आम्ही वारंवार मुख्यालयात येतो आहे. आमची तक्रार आम्ही सदस्यांकडे मांडली. या सोबतच कार्यालयाच्या चकराही मारत आहोत. मात्र, अद्यापही काहीही झाले नाही अशी खंत दौंड तालुक्यातून आलेल्या काहींनी व्यक्त केली.

''मुख्यालयात येणाऱ्यांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी १०० दिवस कार्यक्रमांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण केली जात आहे. जवळपास सर्व विभागाची कामे पूर्ण होत आली आहे. शुक्रवार, शनिवारीही कामे केली जात आहे. काहींची कामे अपूर्ण राहण्याची काही प्रशासकीय अथवा इतर कारणे असू शकतात. त्या सोडवण्याचाही आमचा प्रयत्न असतो असे कमलाकर रणदिवे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन) यांनी सांगितले.''

टॅग्स :zpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारEmployeeकर्मचारी