शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रब्बीसाठी खडकवासला कालव्यातून साडेपाच टीएमसी पाणी, उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 19:55 IST

धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.....

पुणे : रब्बी हंगामासाठी जिल्ह्याच्या तीन तालुक्यांकरिता खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच टीएमसी पाणी यासाठी देण्यात येणार आहे. मात्र, धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

रब्बी हंगामासाठी दौंड, इंदापूर, हवेली या भागातून पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे आली होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आल्याचे खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून कालव्यातून सुमारे ७०० क्युसेकने पाणी ग्रामीण भागात दिले जाणार आहे. येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे साडेपाच टीएमसी पाणी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या खडकवासला प्रकल्पांमधील चारही धरणांत २५.६ टीएमसी अर्थात ८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून साडेपाच टीएमसी पाणी सोडल्यानंतर सुमारे २० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. ग्रामीण भागातही पुरेसा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. तसेच पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही आमदारांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, हे पाणी सोडताना पुणे शहराच्या पिण्याच्या प्रश्न निर्माण होणार नाही, याकडेही महापालिकेने लक्ष वेधले होते. यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने ग्रामीण भागाला केवळ रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडावे, उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याची परिस्थिती नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चारही धरणातील पाणी साठ्याचे व्यवस्थापन यंदा महत्त्वाचे ठरणार असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चारही धरणांमध्ये मिळून सध्या १.५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी याच वेळी चार धरणांमध्ये २७.२२ टीएमसी (९३ टक्के) जलसाठा होता. पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने यापूर्वीच दिला आहे. पिकांसाठी पाणी सोडल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळा येणार नाही, परंतु महापालिका प्रशासनाला पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाला पाणी व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.

टीएमसीमध्ये पाणीसाठा

टेमघर २.११ (५६ टक्के) वरसगाव ११.७ (९१ टक्के) पानशेत १०.२ (९५ टक्के) खडकवासला १.५ (७५ टक्के) भामा आसखेड ६.६७ (८७ टक्के) एकूण २५.६ टीएमसी (८७ टक्के) गेल्या वर्षीचा साठा २७.२ टीएमसी (९३ टक्के)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkhadakwasala-acखडकवासला