शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जांभुळवाडी तलावातील प्रदूषित पाण्याने माशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 18:48 IST

जांभूळवाडी तलावामध्ये मलवाहिनीचे प्रदुषित पाणी तलाव्यात पाझरत असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या  जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. 

आंबेगाव : जांभूळवाडी तलावामध्ये मलवाहिनीचे प्रदुषित पाणी तलाव्यात पाझरत असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या  जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. उपनगरात पाऊस सुरू झाला असला तरी उन्हामुळे सध्या या तलावातील पाणी खुपच कमी झाले आहे.  त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगत आहेत. मेलेल्या माशांमध्ये लहान माशांचे प्रमाण जास्त आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती.  परंतू वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द, जांबुळवाडी रस्त्याचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. आंबेगाव परिसरासाठी महत्त्वाचा व अभिमानस्पद असणाºया या तलावाची निमिर्ती आंबेगाव खुर्द व जांभुळवाडी पाझर तलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेअंतर्गत केली होती. साधारण ९५ आर जमिनीमध्ये सदर तलाव पसरलेला आहे.  पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असतो. या तलावाचे खालील बाजूस विहिरी पाडून आंबेगाव खुर्द, जांभुळ वाडी या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव हा पाझर तलाव असल्यामुळे व उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढत असल्यामुळे तलावातील पाणीसाठा पातळी खुपच प्रमाणात कमी होत चालला आहे. 

टॅग्स :ambegaonआंबेगावfishermanमच्छीमारenvironmentवातावरण