शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नीरा-भीमा कारखान्याची २१०० रुपये पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:19 IST

बँक खात्यात होणार जमा; हर्षवर्धन पाटील यांची माहिती

बावडा : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू सन २०१८-१९ चा ऊस गळीत हंगाम उत्कृष्टरीत्या चालू आहे. या हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला रु. २१०० प्रमाणे पहिली उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहाजीनगर येथे दिली.ते म्हणाले, की कारखान्याने आजअखेर २ लाख १२ हजार ७९० टन उसाचे गाळप पूर्ण करून २ लाख १५ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आजचा साखर उतारा १०.५२ टक्के असून सरासरी साखर उतारा १०.३० टक्के आहे. कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पातून आजअखेर १ कोटी १९ लाख ४६९५१ युनिट वीज एक्स्पोर्ट केली आहे. आसवनी प्रकल्पातून ३४ लाख ९८ हजार ५४६ लिटरचे उत्पादन घेण्यात आले आहे.शेटफळ हवेली तलाव लाभक्षेत्रातील गावांमधील ऊसपिकाला गेल्या मे महिन्यापासून पाणी मिळालेले नव्हते. त्यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या या सर्व उसाची कारखान्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नुकसान सहन करून लवकर तोडणी केली आहे. या उसाला कपात न करता इतर शेतकºयांप्रमाणे दर दिला जाईल. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील पाण्याअभावी जळून चाललेल्या इतर भागातील उसाची शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून प्राधान्याने तोडणी केली जाईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटील यांनी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कारखान्याशी संबंधित सर्व घटनांचे अभिनंदन केले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, अशोक वणवे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने व अधिकारी उपस्थित होते.नीरा भीमा कारखान्याचा चालू गळीत हंगामातील उसाचा अंतिम दर हा इतर कारखान्यांच्यातुलनेत निश्चितपणे अधिकचा असेल, अशी ग्वाहीही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तसेच चालू गळीत हंगामात कारखान्याने ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकºयांनी आपला सर्व ऊस नीरा भीमा कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने