शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रथम येणाऱ्यास प्राधान्यफेरीवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:56 IST

अकरावी प्रवेश : चांगले गुण मिळविणाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता

पुणे : अकरावी प्रवेशाची प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होत आहे. या फेरीवर विद्यार्थी पालक सहाय्य संघाकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. यामुळे चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, त्यामुळे याऐवजी पूर्ववत फेºया राबविण्याची मागणी होत आहे.

अकरावीच्या नियमित व विशेष फेºया पार पडल्यानंतर आता प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य ही फेरी राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयांच्या रिक्त जागांवर जो सर्वात पहिल्यांदा क्लिक करेल त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे चांगले गुण मिळविणाºया तसेच इंटरनेट सुविधांची उपलब्धता नसलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीती विद्यार्थी पालक सहाय्य संघाचे आकाश शिंदे यांनी व्यक्त केली आहे. सोमवार, २७ आॅगस्ट रोजी ८० ते १०० टक्के दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असेल. यामध्ये रिक्त जागेवर सर्वात पहिल्यांदा क्लिक करणाºया विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत जातील. यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २७ ते २८ आॅगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचे आहेत. रिक्त राहिलेल्या जागांची यादी २८ आॅगस्ट रोजी जाहीर होईल. दुसºया प्रवर्गातील ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना २९ ते ३० आॅगस्टदरम्यान प्रवेशाची संधी असेल. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी शिल्लक जागांची यादी जाहीर होईल. तिसºया प्रवर्गातील ३५ ते ६० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळेल.प्रवेशाबाबत प्रभारी उपसंचालिका मिनाक्षी राऊत यांनी सांगितले, मागील वर्षीपासून ही फेरी राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध असणार आहे. ज्यांचे प्रवेश एक -दोन गुणांनी हुकले होते, त्यांना यामध्ये प्रवेश मिळू शकेल.’

पहिला प्रवर्ग ८० ते १०० टक्के, दुसरा प्रवर्ग ६० ते ८० टक्के व तिसरा प्रवर्ग ३५ ते ६० टक्के यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीमध्ये प्रवेश घेऊन रदद् करणारे, प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे, प्रवेश न मिळालेले अशा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे 

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे