शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
3
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
5
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
6
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
7
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
8
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
9
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
10
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
11
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
12
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
13
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
14
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
15
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
16
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
17
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
18
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
19
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
20
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्यांचे पाण्यासाठी सुरू असलेले उपोषण पाच दिवसांनंतर मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:07 IST

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जानाई शिरसाईच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज (मंगळवारी) सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले.

सुपे : बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जानाई शिरसाईच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज (मंगळवारी) सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सहा दिवसांत पाणी सोडतो, असे लेखी पत्र दिल्याने उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले.मागील पाच दिवसांपासून या ठिकाणी उपोषण सुरू होते. या वेळी येथील शेतकरी वेगवेगळ्या दिवशी अनोख्या मार्गाने उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत होते. मंगळवारी (दि. ५) दुपारनंतर महसूल विभागाचे मंडलाधिकारी शिवाजी देस्टेवाड यांनी तहसीलदार पाटील यांच्या आदेशाचे पत्र आणले. या पत्रातील मजकूर उपस्थित शेतकरी बांधवांना वाचून दाखवला. यामध्ये पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून येत्या सहा दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन लेखी पत्राद्वारे दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.या वेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, भरत खैरे, संभाजी होळकर, पोपटराव पानसरे, शौकत कोतवाल, गणेश चांदगुडे, माजी सरपंच विठ्ठल जराड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरीवर्ग उपस्थितीत होता. या वेळी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी व चक्की देऊन गेली सहा दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.काल (सोमवारी) जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली होती. मात्र, काल झालेल्या उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी पाणी सोडण्याबाबतचे पत्र दिले नव्हते. त्यामुळे शिष्टमंडळ पुन्हा उपोषणस्थळी येऊन झालेला प्रकार सांगितला. या वेळी शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात चिडलेला होतामंगळवारी सकाळी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांनी मुंडण करून प्रशासनाचा निषेध करीत उपोषण तीव्र केले होते. या वेळी काही शेतकºयांनी गवळणींच्या गाण्यांच्या तालावर डान्स करून प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, या उपोषणाला धास्तावलेल्या प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बोलणी करुन तहसीलदार यांनी सहा दिवसांत पाणी सोडण्याबाबतचे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी