शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आज अंतिम युक्तिवाद

By नम्रता फडणीस | Updated: November 25, 2024 21:08 IST

पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आज, मंगळवारी (दि. २६) संविधानदिनी विशेष सरकारी वकील ५०० पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद ...

पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आज, मंगळवारी (दि. २६) संविधानदिनी विशेष सरकारी वकील ५०० पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद सादर करणार आहेत. या कालावधीत इतरही कसे गुन्हे घडले? त्यात नक्षलवादी आणि जुने शिक्षा भोगलेले आरोपी कसे होते? यामुळे महाराष्ट्रभर जे दंगे झाले त्याची जबाबदारी कुणाची? ही जबाबदारी ज्यांनी बंद पुकारण्याचा आदेश दिला होता, त्या एका वरिष्ठ बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्याची कशी आहे? त्यांना नुकसानीस कसे जबाबदार धरले जावे, या सर्व मुद्द्यांवर सरकारी वकील युक्तिवादात ऊहापोह करण्याची शक्यता आहे.कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभास २०० वर्षे झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमानंतर हिंसाचार झाला. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दंगल चिघळली, अशा तक्रारी होत्या. त्यावर राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त न्या. जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमित मलिक यांच्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची स्थापना केली.

आयोगासमोर पुणे शहर पोलिसांचे अधिकारी, ग्रामीण पोलिस, माजी जिल्हाधिकारी सौरभ राव, ज्येष्ठ राजकारणी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर, कोरेगाव भीमा आणि वढू बुद्रुकचे ग्रामस्थ, कार्यकर्त्या हर्षाली पोतदार आदी ५३ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी आयोगासमोर त्यांची उलटतपासणी घेतली. त्यानुसार आयोगाचे पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वकिलांना अंतिम युक्तिवाद लेखी स्वरूपात दाखल करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार सरकारी वकील अंतिम युक्तिवाद लेखी स्वरुपात आज (दि.२६) सादर करणार आहेत. या हिंसाचारात सर्वात जास्त नुकसान हे स्थानिकांचे झाले आहे. वडू येथे जो फलक लावला होता, त्यावरूनच वाद झाले असे एक महिला कार्यकर्त्याने कसे सांगितले आहे. हे फलक बामसेफ आणि एल्गारच्या आयोजकांनी लावल्याचे रेकॉर्डवर देखील आले आहे, हे लेखी युक्तिवादातून आयोगासमोर आणले जाण्याची शक्यता आहे.येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोरेगाव भीमा आयोगाचा अहवाल तयार होण्याची शक्यतासुरुवातीला आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता; परंतु त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आयोगाला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत आयोगाचे कामकाज पूर्ण होऊन या प्रकरणाचा अहवाल तयार होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय