शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

साहित्यकृतींवर आधारीत चित्रपट निर्मिती व्हावी : लक्ष्मीकांत देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:39 PM

संवाद आणि आशय फिल्मतर्फे ‘संवाद मराठी चित्रपटांचा’ हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदिग्दर्शकांनी कथा, पटकथा, संवाद याबाबींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या छायाचित्रापासून आतापर्यंतचा आढावा

पुणे : चित्रपट ही मानवी मनाचे दर्शन घडवणारी कला आहे. साहित्यकृतीतून शाश्वत मूल्ये जपली जातात. हे मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्यकृतीवर आधारित मराठी चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक आहे. साहित्यावर आधारित चित्रपट निर्मिती झाल्यास या माध्यमातून रसिकांना पुनश्च आनंद घेता येईल. साहित्यावर आधारित चित्रपट निर्मिती ही बाब चित्रपट आणि साहित्यकृती एकमेकांना पूरक अशीच आहे, असे मत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.    संवाद आणि आशय फिल्मतर्फे ‘संवाद मराठी चित्रपटांचा’ हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त भरवण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी संवादचे प्रमुख सुनील महाजन, राजू कावरे, नारायण मोकाशी, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते. या प्रदर्शनात सुमारे चाळीसहून अधिक छायाचित्र लावण्यात आली असून राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या छायाचित्रापासून आतापर्यंतचा आढावा घेण्यात आला आहे. छायाचित्र प्रदर्शन ४ मेपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे. छायाचित्र प्रदर्शन उदघाटनानंतर झालेल्या रसास्वाद लघुपट-अनुबोधपटांचा या कार्यशाळेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते आणि ज्येष्ठ चित्रपट रसास्वाद अभ्यासक श्यामला वनारसे यांनी मार्गदर्शन केले. या अभिनव कार्यशाळेत पूर्ण लांबीच्या चित्रपटाचा विषच एका छोट्याशा लघूपटातून प्रभावीपणे मांडता येऊ शकत असणाऱ्या माध्यमांचे तंत्र, दिग्दर्शन, लेखन, संगीत, अशा विविध अंगांचा शास्त्रशुद्ध परिचय आणि मूलतत्वांची ओळख करून देण्यात आली. देशमुख म्हणाले, ‘दिग्दर्शकांनी कथा, पटकथा, संवाद याबाबींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. मराठी चित्रपटांचा हा आलेख अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. ज्या दिग्दर्शकाला साहित्याचे अंग नाही, तो मोठा चित्रपट बनवू शकत नाही. चित्रपट ही कला केवळ मानवनिर्मित नसून ती विज्ञाननिष्ठ देखील कला आहे. चित्रपट माध्यम हे अभिव्यक्तीसाठी अधिक जवळचे वाटते.’ 

टॅग्स :Puneपुणे