शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

लढा कोरोनाशी! ८० वर्षांच्या आजींची ३४ दिवसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 13:40 IST

इच्छाशक्ती आणि आध्यत्मिकतेच्या जोरावर कोरोनाला हरवले

ठळक मुद्देबेनकर यांना रक्तदाब आणि मधुमेह असून त्यांची दोनदा शस्त्रक्रिया झाली

धायरी: जगभरात सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून अनेकजण त्यात बळी पडत आहेत. परंतु इच्छाशक्ती आणि आध्यत्मिकतेच्या जोरावर धायरी येथील ठकूबाई नारायण बेनकर या ८० वर्षाच्या आजीने तब्बल ३४ दिवस लढा देत कोरोनावर मात केली आहे. आजींना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवाराने त्यांचे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने स्वागत केले.

बेनकर यांना काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्वरित त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला. त्यानंतर आजींना कर्वे रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात १५ एप्रिलला दाखल करण्यात आले होते. बेनकर यांना रक्तदाब आणि मधुमेह आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती आणि त्यांचा स्कोर ९ आला होता. त्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.

तब्बल १८ दिवस आयसीयुमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली.  त्यानंतर त्यांना कोव्हीड वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. यावेळी आठ दिवस याठिकाणी उपचार घेत असताना कोरोना संसर्ग आटोक्यात आला होता. कोरोना संसर्गाची लक्षणे कमी झाल्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तिथून नऊ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना आजींनी सकारात्मक विचार करत आध्यत्मिकतेचा जप केला. तसेच त्यांच्या परिवाराने देखील वेळोवेळी सकारात्मक विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आजीने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. 

२३ वेळा पायी केली विठ्ठलाची वारीपुणे शहराची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणाच्या आणि कात्रज येथील बोगदा निर्मितीमध्ये आजींचे योगदान आहे. तसेच त्या वारकरी संप्रदायांच्या असून त्यांनी तब्बल २३ वेळा आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाची पायी वारी पूर्ण केली आहे.

विठ्ठलाची कृपा असल्यामुळे या महाभयंकर कोरोना संसर्गातून मुक्तता झाली. रुग्णालयात उपचार घेत असताना सातत्याने मी विठ्ठलाचा जप करत होते. तसेच माझ्या परिवाराने देखील वेळोवेळो सकारात्मक विचार करण्यास सांगितले. या सर्व गोष्टींमुळे मी कोरोनाला हरवू शकले. असे ठकूबाई बेनकर यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल