शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

भाकरीबरोबर तवा देखील करपल्याची भावना म्हणून... : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 20:02 IST

लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतर देखील झाले. मात्र भाकरी फिरविता फिरविता आमचा तवा देखील करपून गेला.

ठळक मुद्देअद्याप लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका नाही

पुणे : मागील लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या अनुभवामुळे भाकरीबरोबर तवा देखील करपल्याची भावना आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांपासून समान अंतर राखून आहे. अद्याप निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका ठरली नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन आणि शेतकरी प्रश्नांबाबत शेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारवर निष्प्रभतेचा आरोप करुन स्वाभिमानीने युतीचा हात पडकला होता. मात्र, मतभेद झाल्यानंतर शेट्टी युतीतून बाहेर पडले. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीची चर्चा सुरु असल्याचे विचारले असता शेट्टी म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतर देखील झाले. मात्र भाकरी फिरविता फिरविता आमचा तवा देखील करपून गेला. त्यामुळे या वेळी अधिव सावध आहोत. सध्या सर्वच पक्षांपासून समान अंतरावर आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर जायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, लोकसभेत असलेले हमी भाव विधेयक आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती याला जो पक्ष पाठिंबा देईल आणि सत्ताबदल झाल्यावर प्रलंबित विधेयकाची अंमलबजावणी करण्याची खात्री देईल त्यांच्या समवेत जाऊ असे शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाGovernmentसरकार