शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी झाला हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:47 IST

परिसरात कांदा काढणीला वेग आला असून कांद्याला योग्य भाव नसल्याने व वारंवार कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

चाकण - परिसरात कांदा काढणीला वेग आला असून कांद्याला योग्य भाव नसल्याने व वारंवार कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला हमीभाव मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चाकण परिसरात कांदा काढणीला वेग आला असून, चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आवक वाढल्याने कांदा जनावरांच्या बाजारात ठेवावा लागत आहे. चाकण बाजारात २० हजार ९० क्विंटल आवक झाली आहे. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ७५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात मोठी नाराजी आहे. चाकण परिसरात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेत आहे. यावर्षी चांगला भाव मिळेल अशी आशा शेतक-यांमध्ये होती, पण सध्याच्या भाजपा सरकारने शेतकºयांची घोर निराशा केली आहे, अशी शेतकºयांनी भावना व्यक्त केली आहे.यावर्षी कांदा लागवड करण्यासाठी रोपांचा तुटवडा असतानाही चाकण परिसरातील शेतकºयांनी कांदा रोप तयार करून व महागडी रोपे घेऊन कांदा लागवड केली. चाकण बाजारात प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने भावात घसरण होत आहे.भोरला कांदा उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडलेनेरे : आज ना उद्या कांद्याचा बाजारभाव वाढेल, या आशेवर भोर तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन-तीन वर्षांत कांद्याचे भरघोस पीक घेत होते. मात्र गेले दोन वर्षांपासून कांद्याला योग्य तो बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून शेतकºयांचे अर्थकरण कोलमडले आहे.गतवर्षी शेतकºयांनी काढलेला कांदा साठवणूक करून ठेवला होता. या वेळी तरी बाजारभाव वाढतील ही आशा शेतकºयांना होती. मात्र आजची परिस्थिती पाहता शेतकºयांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. त्यातूनच नवीन कांद्याची आवक चालू झाल्याने जुन्या कांद्याला कोणी विचारणासेही झाले आहे. नवीन कांदा चाळीस ते पन्नास रुपये तर जुना कांदा २० ते ३० रुपये १० किलो दराने बाजारात विकला जात आहे.मागील तीन वर्षांपूर्वी दहा किलोला ११० ते १४० रुपये भाव मिळाला होता.गतवर्षी शेतकºयांनी जास्तीत जास्त कांदा लागवड केली होती. मात्र बाजार घसरल्याने शेतकºयांच्या आशाच्या निराशा होऊन बसल्या आहेत. शासनाने कांदा निर्यातीकडे लक्ष देणे गरजेचे असून, हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.कांद्याचे रोप, लागवड, औषधफवारणी, काढणी, वाहतूक हा सर्व खर्च वजा जाता दोन वर्षांपासून शेतकरी तोट्यात असल्याचे बाजारवाडी (ता. भोर) येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कृष्णा शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :onionकांदाPuneपुणे