शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘या ’ गावाची पाणीपट्टी करणार शेतकरीच वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 15:25 IST

नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगुजवणी धरण प्रकल्पांतर्गत १७८ पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्यात येणार धरणातील पाणी अत्याधुनिक पध्दतीने पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार

पुणे : गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना दिल्यानंतर पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवरच सोपविली जाणार आहे.या नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंजवणी धरण प्रकल्प पूर्ण झाला. धरणातील पाणी अत्याधुनिक पध्दतीने पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गुंजवणी धरणातून पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा १६ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाली. पाईपलाईनसाठी वेगळ्या प्रकारचे डिझाईन जलसंपदा विभागाने तयार केले आहे. चार वर्षात पाईपलाईनचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच संबधीत ठेकेदारास या पाईपलाईनची पाच वर्ष देखभाल करावी लागणार आहे. गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतक-यांच्या पिकांना  देण्यासाठी महाराष्ट्र सिंचन पध्दत व्यवस्थापन कायदा २००५ नुसार ह्यपाणी वापर संस्थाउभारण्यात येणार आहेत. संस्था स्थापनमध्ये शेतकरीच संचालक म्हणून काम करणार आहेत.जलसंपदा विभागाकडून त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देणार आहे. तसेच या पाणी वापर संस्थाच शेतक-यांकडून पाणीपट्टी वसुल करणार आहेत. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रविण कोल्हे म्हणाले,गुजवणी धरण प्रकल्पांतर्गत १७८ पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सोसायट्यामध्ये कार्यरत असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी वसुल करणे शक्य होईल. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून पाणीपट्टी वसूलीबाबत नवीन पध्दती अवलंबली जात आहे. त्याबाबतचे सादरीकरण औरगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या सूक्ष्म सिंचन कार्यशाळेत करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी