शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘या ’ गावाची पाणीपट्टी करणार शेतकरीच वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 15:25 IST

नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देगुजवणी धरण प्रकल्पांतर्गत १७८ पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्यात येणार धरणातील पाणी अत्याधुनिक पध्दतीने पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार

पुणे : गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना दिल्यानंतर पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवरच सोपविली जाणार आहे.या नावीन्यपूर्ण पध्दतीमुळे जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम वसुल होण्यास मदत होणार आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंजवणी धरण प्रकल्प पूर्ण झाला. धरणातील पाणी अत्याधुनिक पध्दतीने पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गुंजवणी धरणातून पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा १६ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाली. पाईपलाईनसाठी वेगळ्या प्रकारचे डिझाईन जलसंपदा विभागाने तयार केले आहे. चार वर्षात पाईपलाईनचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच संबधीत ठेकेदारास या पाईपलाईनची पाच वर्ष देखभाल करावी लागणार आहे. गुंजवणी प्रकल्पातील पाणी शेतक-यांच्या पिकांना  देण्यासाठी महाराष्ट्र सिंचन पध्दत व्यवस्थापन कायदा २००५ नुसार ह्यपाणी वापर संस्थाउभारण्यात येणार आहेत. संस्था स्थापनमध्ये शेतकरीच संचालक म्हणून काम करणार आहेत.जलसंपदा विभागाकडून त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देणार आहे. तसेच या पाणी वापर संस्थाच शेतक-यांकडून पाणीपट्टी वसुल करणार आहेत. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रविण कोल्हे म्हणाले,गुजवणी धरण प्रकल्पांतर्गत १७८ पाणी वापर सोसायट्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच सोसायट्यामध्ये कार्यरत असलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील पाणीपट्टी वसुल करणे शक्य होईल. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून पाणीपट्टी वसूलीबाबत नवीन पध्दती अवलंबली जात आहे. त्याबाबतचे सादरीकरण औरगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या सूक्ष्म सिंचन कार्यशाळेत करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी