शेतक:यांनी पुन्हा काम पाडले बंद

By Admin | Updated: November 12, 2014 23:17 IST2014-11-12T23:17:21+5:302014-11-12T23:17:21+5:30

पोलीस फाटा दिमतीला घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिका:यांना भांबोलीकराच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Farmers: They Work Again | शेतक:यांनी पुन्हा काम पाडले बंद

शेतक:यांनी पुन्हा काम पाडले बंद

आंबेठाण : पोलीस फाटा दिमतीला घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिका:यांना भांबोलीकराच्या रोषाला सामोरे जावे लागले. जोर्पयत आमचे परतावे वाटप आणि प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाहीत, तोर्पयत रस्त्याचे काम होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा भांबोली (ता. खेड) येथील शेतक:यांनी दिला आहे.
भांबोली (ता. खेड) या गावच्या जमिनी चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनसाठी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु, संपादनानंतर कित्येक वर्षे लोटली, तरी 15 टक्के परतावे आणि इतर मागण्या प्रलंबित आहेत. या निषेधार्थ येथील शेतक:यांनी येथे सुरू असणारे 75 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम मागील कित्येक महिन्यांपासून अडविले आहे. आज पुन्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी पोलीस बंदोबस्त घेऊन काम सुरू करण्यासाठी आले. तेव्हा पुन्हा शेतकरी जमा झाले आणि त्यांनी काम बंद पाडले.
आम्हाला आमचे परतावे त्वरित मोजून दिले जावे आणि ते विभागून न देता एकाच जागी द्यावे, अशीही मागणी या वेळी शेतक:यांनी केली. शेतक:यांना 15 टक्के जमिनीचे परतावे मिळत नाहीत, घराचे अडीच गुंठे परतावे मिळत नाहीत. स्थानिक शेतक:यांच्या परताव्याला कमी फ्रंट आणि इतर शेतक:यांच्या कमी क्षेत्नाला जास्त फ्रंट, असा भेदभाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी करीत आहेत. त्या निषेधार्थ हा रास्ता रोको करीत असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. तसेच, खातेदार म्हणून एक शेतकरी असेल आणि त्याला तीन मुले असतील, तर अशा शेतक:याला प्रत्येक मुलामागे एक, असा घराचा परतावा मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतक:यांनी या वेळी केली.
या प्रसंगी नंदू निखाडे, दशरथ राऊत, सदाशिव राऊत, मुरलीधर राऊत, यमुनाबाई राऊत, नारायण राऊत, सहदेव लांडगे, सरस्वती राऊत, फासाबाई लांडगे, एकनाथ राऊत, सुमन राऊत, दत्तात्नय लांडगे, रामदास राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 
पोलीस म्हणतात, की या वेळी पोलिसांनी शेतक:यांना कायद्याचा धाक दाखवीत आत टाकण्याची धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून आत टाकण्याची धमकी दिली.
 
शेतक:यांना पूर्वी परतावे वाटप केले आहेत. याची पुन्हा मोजणी करून हवी असेल, तर त्यांनी तसे अर्ज करावे. त्यांना पुन्हा परतावे मोजून दिले जातील.
-विनय क्षेमकल्याणी, सर्वेअर,एमआयडीसी
 
गरीब शेतक:याला कुठेतरी ओढय़ाला परतावा दिला जात असून, गुंतवणूकदारांना मात्न मोक्याच्या ठिकाणी आणि सपाट जमीन पाहून परतावा दिला जात आहे. गरीब शेतक:याला ओढय़ासारख्या ठिकाणी परतावा दिला जात असल्याने त्याची अडचण होत आहे. त्याला जमीन सपाट करणो आणि आदी कामांसाठी प्रचंड वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. चार पैसे घेऊन अधिकारी चुकीचे काम करत असल्याने त्याचा परिणाम शेतक:यांना भोगावा लागत आहे, असाही आरोप संतप्त शेतक:यांनी केला.
 
चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे आणि त्याचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता डी. डी. पांगारे, उपअभियंता अजय महिंद्रकर, सहायक अभियंता एस. एम. कवडगी, सर्वेअर विनय क्षेमकल्याणी उपस्थित होते. अखेर, उपस्थित अधिका:यांच्या विनंतीला मान देत शेतक:यांनी दोन दिवसांत परतावे मोजून देण्याच्या अटीवर रस्त्याचे काम सुरू करण्यास मान्यता दिली.

 

Web Title: Farmers: They Work Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.