शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

जेऊरमध्ये शेतक-याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:35 PM

शेतकऱ्याच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे.

ठळक मुद्दे अल्पशा जमिनीतुन आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चिंतेत अजूनच भर

नीरा:  जेऊर येथील शेतकरी मोहन पांडुरंग तांबे (वय ४२)  यांनी राहत्या घरात गुरुवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तांबे यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे यांचे कुटुंब नुकतेच विभक्त झाले होते. आत्महत्येपूर्वी ते तणावाखाली असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यावेळी ही परिस्थिती हळूहळू बदलू शकते त्यामुळे आत्महत्येसारख्या टोकाचा विचार करू नको असा सल्ला त्यांना मित्रांनी दिला होता. त्याच बरोबर त्यांच्या वाट्याला आलेल्या अल्पशा जमिनीतुन आळंदी पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली होती. तांबे यांच्या आत्महत्येचे नक्की कारण आद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा गावात आहे. या घटनेविषयी जेजुरी पोलीस ठाण्यात उशिरा माहिती कळविण्यात आली आहे. या घटनेविषयी तत्काळ कोणताही अंदाज बांधणे शक्य नसल्याने तपासाअंती आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तांबे यांच्या पाठीमागे आई,दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.

टॅग्स :Jejuriजेजुरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याPoliceपोलिस