शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी त्रस्त, कर्जमाफी अर्जाच्या तांत्रिक त्रुटी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:44 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या तांत्रिक अडचणी कायम आहेत. महा-ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र तसेच सीआरसी सेंटर्स अशा केंद्रांमधून हे अर्ज भरून घेतले जात आहे

कोरेगाव मूळ : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या तांत्रिक अडचणी कायम आहेत. महा-ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र तसेच सीआरसी सेंटर्स अशा केंद्रांमधून हे अर्ज भरून घेतले जात आहे. परंतु वारंवार होणाºया सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरताना विलंब होत आहे. अनेक ठिकाणी खातेफोड, सातबारा उतारावर समाविष्ट असलेल्या कुटुंबांतील सदस्यांनी विविध वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज यामुळे अर्ज भरताना शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी कर्ज घेणाºया शेतकºयाचा मृत्यू झाला असून, त्याच्या वारसाचे नाव सातबारा उतारावर नाव लागले नसल्याने कर्जमाफी द्यायची कशी ? असा प्रश्न भेडसावत आहेत.लेखी अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेसही शेतकºयांचा पुरेसा प्रतिसाद नाही. आॅनलाइन एक अर्ज भरण्यास तब्बल १५ ते २० मिनिटे जात असल्याने तसेच त्यादरम्यान इंटरनेट सर्व्हर डाऊन असणे, त्याला गती नसणे, वीजपुरवठा बंद असल्यास इंटरनेटही बंद असण्यासारखे प्रकार होत आहे. यामुळे हे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची उत्सुकताही कमी होऊ लागली आहे. कर्जमाफी अर्ज भरताना आधार नंबर व त्याला मोबाईल लिंकिंगही गरजेचे आहे. काही शेतकºयांचे मोबाईल आधार लिंक नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. अनेकांकडे नवे मोबाईल असल्याने व त्यांचे आधार लिंकिंग झाले नसल्याने अशांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांचे आॅनलाइन लिंकिंग करण्यासाठी पीओएस मशिन देण्यात आलेले आहेत. परंतु पीओएस मशीनमध्येही त्रुटी येत असून, अंगठ्याचे ठसे कनेक्ट होत नाहीयेत.राजगुरुनगरला ठसे यंत्रणेत बिघाडराजगुरुनगर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आधारदेणारी कर्जमाफी शेतकºयांसाठी डोकेदुखी असल्याचे चित्र दिसत आहे. आधारकार्ड लिंक करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांचे बोटांचे ठसे फिंगर प्रिंट रीडर यंत्रावर जुळत नसल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे तीन तसेच चºहोली, आळंदी, मरकळ, शेल पिंपळगाव, चाकण, खराबवाडी, म्हाळुंगे, चास, वाडा येथे महा-ई-सेवा केंद्रे आहेत. या महा-ई-सेवा केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत.कधी सर्व्हर डाऊन तर कधी इंटरनेट बंद,अशा असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे.त्यामुळे शेतकºयांना दिवसभर उपाशी-तापाशी रांगेत उभे राहावे लागत आहे. सन २०११ ते २०१४ या कालावधीत ज्या व्यक्तींनी आधारकार्डकाढले आहे, अशा ग्राहकांचे बायोमेट्रिकअपडेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले आधारकार्ड त्याच व्यक्तीचे आहे कीनाही हे ठामपणे सांगता येत नाही. अनेकांनालिंक करण्यात अडचणी येत आहे. हे कार्ड दिलेल्या मुदतीत लिंक न झाल्यास पीककर्जमाफ होईल की नाही अशी भीती शेतकºयांना वाटत आहे.राजगुरुनगर शहरातील आधार कार्ड काढण्याची केंद्र बंद झाली आहे.त्यामुळे शेतकºयांना चाकण (ता. खेड) येथेआधार काढण्यासाठी जावे लागते.शेतातील कामधंदा सोडून महिला व शेतकºयांना काम तर होत नाही; मात्रहेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र दिसतआहे.अटीप्रमाणे सन २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दि़३० जून २०१६ पर्यंत पूर्ण परतफे ड केलेल्या शेतकºयांनी २०१६-१७ वर्षात घेतलेल्या कर्जाची दि़३१ जुलै २०१७ पर्यंत परतफे ड केल्यास त्यांना सन २०१५-१६ या वर्षामधील परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५००० हजार रुपयांपर्यंत यापैकी जी कमी असेल, ती रक्कम शेतकºयांना देण्यात येणार आहे. मात्र, ही रक्कम किमान रुपये १५ हजार रुपये असेल. तथापि शेतकºयांना कर्जांची पूर्णत: परतफे ड केलेली रक्कम रुपये १५ हजारांपेक्षा कमी असल्यास अशी संपूर्ण रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे़या अटीनुसार एखाद्या शेतकºयाने सन २०१५-१६ या वर्षात कर्ज घेतले आणि त्याचे निधन झाले, तर त्या खात्यावरील कर्जाची परतफेड दि़३० जून २०१६ पर्यंत त्याचा वारसदार करेल आणि २०१६-१७ मध्ये त्यांचा वारसदार हा पीक कर्ज घेणारा नवीन खातेदार ठरेल़शासन निकषानुसार तो नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना जी २५००० हजार व किमान १५००० च्या मिळणाºया रकमेच्या अटीत तो शेतकरी बसत नाही. ज्यांच्या पालकांचे २०१५-१६ वर्षात निधन झाले असेल, तर ते खातेदार सतत २ वर्षे नियमित कर्ज भरत नाहीत़ कारण, सन २०१५-१६ या वर्षात वडील किंवा आई कर्जदार असते तर २०१७ वर्षात त्यांचे वारसदार हे नवे खातेदार होत असल्यामुळे कर्जमाफी फायद्यापासून ते वंचित राहतील.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार