शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

By नितीन चौधरी | Updated: April 22, 2025 12:31 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, जिल्ह्याच्या पाच वर्षांच्या शेती आराखड्याचे विमोजन 

पुणे : “शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्याचा प्रयत्न असून, आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी धोरण आखले जात आहे. शेतकऱ्यांच्या मनात यापुढे आत्महत्येची भावना येणार नाही, असे काम करायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, नाउमेद होऊ नये. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागातर्फे दिशा कृषी उन्नतीची या जिल्ह्यातील शेतीच्या पाच वर्षांच्या आराखड्याच्या विमोचनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार बापू पठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी संचालक रफीक नाईकवाडी, राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बँक ऑफ महाराष्ट्राचे देवदत्त रोकडे, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन राजे, चेतन डेडिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, “जिल्ह्याचा शेतीचा पाच वर्षांचा आराखडा आखण्यात येत आहे. केवळ लक्ष्यांक आणि आकड्यांवर यात भर नसून, जिल्ह्याच्या कृषीची बलस्थाने आणि उणिवा यावर काय करता येईल तसेच याला वैज्ञानिक आणि व्यावहारिक जोड कशी देता येईल हे या आराखड्यात मांडण्यात आले आहे. त्यासाठी निधीची उपलब्धतादेखील करून दिली जाईल. मात्र, हा निधी त्याच कामासाठी वापरावा. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. तसेच त्याचा उत्पादन खर्च कमी करावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान हवामानासह बाजारपेठेची साथ देणे गरजेचे आहे. केवळ उत्पादन करून चालणार नसून, बाजारपेठही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे.”

आपल्या भाषणात पवार यांनी खरीप पीक विमा योजनेबाबत भाष्य केले. एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक बनावट अर्जदारांनी अक्षरशः चुना लावला. त्यामुळे आता याबाबत नव्याने विचार केला जात असून, मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री यांची एकत्रित बैठक झाली असून त्यात शेतकऱ्यांना चांगला कार्यक्रम देऊ, असे आश्वासन पवारांनी यावेळी दिले. हा कार्यक्रम नेमका कसा असेल याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, त्यांना अंधारात ठेवणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

कोकाटे म्हणाले की, मी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना लक्षात घेता शेतीसाठी नवीन धोरण तयार करण्याचे विचारात आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्नवाढीची जबाबदारी कृषी विभागाची असून, शेतकऱ्यांनी नैसर्गिक सेंद्रिय शेतीतून चांगले उत्पादन काढल्यास त्याच्या निर्यातीलाही वाव आहे, असेही ते म्हणाले.

डुडी म्हणाले, “जिल्ह्यातील शेतीमध्ये बदल घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी निर्देश दिले होते. त्यानंतर सुमारे ५० बैठकांमधून पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्य पिकांची उत्पादकता वाढली पाहिजे, असा त्यात प्रयत्न केला आहे.” रस्तोगी यांनी राज्याच्या जीडीपीत वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे गरजेचे असल्याचे बोलून दाखविले. संजय काचोळे यांनी आभार मानले. यावेळी पवार यांच्या हस्ते शेतकरी तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू : कोकाटे

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी पुण्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठ सामायिक केले. अजित पवार यांनी कृषिमंत्री म्हणून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, अशी ग्वाही दिली. मी खात्रीने सांगतो की, भविष्यात शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे कोकाटे यांनी एका अर्थाने आपल्या बाजूने सारवासारव केल्याचे दिसून आले. तसेच कृषी विभागाच्या यापूर्वीच्या सचिव व आयुक्तांनी काहीही काम केले नाही, त्यांचे कृषी विभागाकडे लक्ष नव्हते असेही ते म्हणाले. त्यामुळे आताच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोरील आव्हाने पेलावी लागतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारAgriculture Sectorशेती क्षेत्र