शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

By नितीन चौधरी | Updated: April 22, 2025 12:31 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, जिल्ह्याच्या पाच वर्षांच्या शेती आराखड्याचे विमोजन 

पुणे : “शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्याचा प्रयत्न असून, आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी धोरण आखले जात आहे. शेतकऱ्यांच्या मनात यापुढे आत्महत्येची भावना येणार नाही, असे काम करायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, नाउमेद होऊ नये. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागातर्फे दिशा कृषी उन्नतीची या जिल्ह्यातील शेतीच्या पाच वर्षांच्या आराखड्याच्या विमोचनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार बापू पठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी संचालक रफीक नाईकवाडी, राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बँक ऑफ महाराष्ट्राचे देवदत्त रोकडे, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन राजे, चेतन डेडिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, “जिल्ह्याचा शेतीचा पाच वर्षांचा आराखडा आखण्यात येत आहे. केवळ लक्ष्यांक आणि आकड्यांवर यात भर नसून, जिल्ह्याच्या कृषीची बलस्थाने आणि उणिवा यावर काय करता येईल तसेच याला वैज्ञानिक आणि व्यावहारिक जोड कशी देता येईल हे या आराखड्यात मांडण्यात आले आहे. त्यासाठी निधीची उपलब्धतादेखील करून दिली जाईल. मात्र, हा निधी त्याच कामासाठी वापरावा. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. तसेच त्याचा उत्पादन खर्च कमी करावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान हवामानासह बाजारपेठेची साथ देणे गरजेचे आहे. केवळ उत्पादन करून चालणार नसून, बाजारपेठही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे.”

आपल्या भाषणात पवार यांनी खरीप पीक विमा योजनेबाबत भाष्य केले. एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक बनावट अर्जदारांनी अक्षरशः चुना लावला. त्यामुळे आता याबाबत नव्याने विचार केला जात असून, मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री यांची एकत्रित बैठक झाली असून त्यात शेतकऱ्यांना चांगला कार्यक्रम देऊ, असे आश्वासन पवारांनी यावेळी दिले. हा कार्यक्रम नेमका कसा असेल याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, त्यांना अंधारात ठेवणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

कोकाटे म्हणाले की, मी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना लक्षात घेता शेतीसाठी नवीन धोरण तयार करण्याचे विचारात आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्नवाढीची जबाबदारी कृषी विभागाची असून, शेतकऱ्यांनी नैसर्गिक सेंद्रिय शेतीतून चांगले उत्पादन काढल्यास त्याच्या निर्यातीलाही वाव आहे, असेही ते म्हणाले.

डुडी म्हणाले, “जिल्ह्यातील शेतीमध्ये बदल घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी निर्देश दिले होते. त्यानंतर सुमारे ५० बैठकांमधून पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्य पिकांची उत्पादकता वाढली पाहिजे, असा त्यात प्रयत्न केला आहे.” रस्तोगी यांनी राज्याच्या जीडीपीत वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे गरजेचे असल्याचे बोलून दाखविले. संजय काचोळे यांनी आभार मानले. यावेळी पवार यांच्या हस्ते शेतकरी तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू : कोकाटे

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी पुण्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठ सामायिक केले. अजित पवार यांनी कृषिमंत्री म्हणून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, अशी ग्वाही दिली. मी खात्रीने सांगतो की, भविष्यात शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे कोकाटे यांनी एका अर्थाने आपल्या बाजूने सारवासारव केल्याचे दिसून आले. तसेच कृषी विभागाच्या यापूर्वीच्या सचिव व आयुक्तांनी काहीही काम केले नाही, त्यांचे कृषी विभागाकडे लक्ष नव्हते असेही ते म्हणाले. त्यामुळे आताच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोरील आव्हाने पेलावी लागतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारAgriculture Sectorशेती क्षेत्र