शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

किसान सन्मानचे पैसे जमाकरून खतांच्या किमती वाढवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:09 AM

(रविकिरण सासवडे) बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ...

(रविकिरण सासवडे)

बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या कंबरेचे सोडून त्यांच्याच डोक्याला बांधण्याचा प्रकार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागल्या आहेत.

रासायनिक खतांच्या किमतीचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते. सलग दुसऱ्यावर्षी कोरोना संकटाचा सामना करत शेतकरीवर्गाकडून खरिपाची तयारी सुरू आहे. तर, बागायती पट्ट्यात देखील याच सुमारास ऊस लागवडी केल्या जातात. नेमकी हीच वेळ साधत रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचे गणित कोलमडणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शेतमालाला कवडीचीही किंमत मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आगामी हंगामात भांडवल कसे उभे करायचे, या विवनचनेत शेतकरी असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. इंधनदरवाढीमुळे मशागतीचा देखील खर्च वाढला आहे. आता खतांच्या किमतीसुद्धा वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्यांतून एकदा २ हजार याप्रमाणे पैसे जमा केले. त्यानंतर लगेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना मदत केल्यासारखे दाखवून लुटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनानी केला आहे.

-----------------

बारामती येथे माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये. एनपीके खतांचा वापर करावा. केंद्र सरकारला आमची विनंती आहे की, रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात. तसेच, किमती वाढल्यामुळे वेगवेगळी खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत.

-----------------

कोरोना संकट आणि आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या किमती वाढवने म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात ढकलण्यासारखे आहे. खराप हंगामावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. देशाच्या अन्नसुरक्षेवर देखील याचा परिणामी होईल. खतांच्या वाढीव किमती तातडीने मागे घेतल्या पाहिजेत किंवा हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यायला हवे.

- डॉ. अजित नवले

राज्य सरचिटणीस

अखिल भारतीय किसान सभा

-------------------

रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा खरेतर देशद्रोह आहे. किमती वाढवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हाताबाहेर रासायनिक खते जाणार आहेत. परिणामी, गोरगरीब शेतकरी खतांचा वापर करणार नाही. देशाच्या उत्पन्न व उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. देशाचे उत्पादन घटणार असल्याने रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा देशद्रोह आहे.

-पांडुरंग रायते

जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे

--------------------

रासायनिक खतांचे जुने व नवीन दर

खते जुने दर नवीन दर

१०:२६:२६ - १, १७५ - १, ७७५

१२:३२:१६-१,१९०-१८००

२४:२४:०- १,३५०- १,९००

२०:२०:०-९७५- १,३५० ते १,४००

२०:२०:१३-१०५० ते १,०००- १,३५० ते १,६००

डीएपी - १,१८५ ते १,२०० - १,९००

पोटॅश - ८५० - १,०००