शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतक-यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारच: पाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुजित खैरे, ग्रामपंचायत सदस्य आरीफ आतार, संतोष ...

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुजित खैरे, ग्रामपंचायत सदस्य आरीफ आतार, संतोष दांगट, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, गणेश पाटे, विकास तोडकरी, अजित वाजगे, जालिंदर खैरे, किशोर पाटे आदींसह शेतकरी वसंत तांबे, राजाराम तांबे, सचिन तांबे, संपत तांबे, अनंत तांबे, कांताराम तांबे, निवृत्ती तांबे, नारायण तांबे, दिपक तांबे, ज्योती तांबे, वनिता तांबे, माधुरी तांबे, अंजली तांबे, माया तांबे, रूक्मिणी तांबे व इतर शेतकरी उपस्थित होते.

सरपंच पाटे म्हणाले की, नारायणगाव येथील सर्वे नं. २४/१९४ व २५/१९३ मध्ये सन २००८ साली तहसिलदार जुन्नर यांच्या आदेशान्वये पोलीस बंदोबस्तात व प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावर अमोल तांबे, गिताराम तांबे, शुभांगी तांबे, ओंकार तांबे यांनी शासनाने मंजूर केलेला रस्ता नांगरून त्यामध्ये ऊसाची लागवड केली होती. सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी सर्व शेतक-यांसमवेत गेलो असता त्यावेळी गिताराम तांबे व त्यांचे कुटूंबियांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. त्यावेळी आपण दोन्ही बाजुचे शेतक-यांना समजावून सांमज्यसाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजकीय दबावापोटी जाणीवपुर्वक आपल्यासह चार जणांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतक-यांच्या हितासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहू अशी माहिती सरपंच पाटे यांनी दिली.

यासंदर्भात शेतक-यां संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे म्हणाले की, कायदा, सुव्यवस्था बिघडेल अशी भुमिका कुणीही घेऊ नये. सर्व शेतक-यांच्या भावना व कागदपत्रांची पाहणी करून रस्त्यासंदर्भात योग्य ती भुमिका घेतली जाईल. महिलेने तक्रार केल्यामुळे सरपंच यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गेली दोन दिवसांपासून या घटनेची चर्चा सोशल मिडीयावर सुरू झाली. या प्रकारानंतर अनेक शेतक-यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याकडे सरपंच योगेश पाटे यांचेवर खोटा व राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्याचा आरोप केला.

फोटो -

नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या शेतक-यांना रस्त्यासंदर्भात मार्गदर्शन करताना नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे