शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कवडीमोल भाव....शेतकऱ्याने दीड एकर कांद्याच्या शेतात सोडल्या शेळ्या मेंढ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:05 IST

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देमशागत, कांदा रोपे लागवड, खुरपणी, औषधे फवारणी यामध्ये ७० हजार रुपये पाण्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची केली लागवड

दावडी : दोन महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करुन कांदा पिकाची लागवड केली होती. या पिकातून चार दोन पैसे मिळतील आणि त्यातून कुटुंबाचा गाडा हाकण्यास मदत होईल ही अपेक्षा होती. पण सध्या कांद्याला जो भाव मिळतोय त्याने कांद्याचा साधा खर्च देखील वसूल होत नाही..त्यामुळेच खरपुडी (ता खेड )  येथील विजय काशिद या शेतकऱ्यांने दीड एकर कांदा पिकात शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्या.  मागील वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळाला म्हणून यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली. मात्र, भावात ५०० ते ६०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. रोज नवा कांदा बाजारात येऊ लागल्यामुळे पुढे कांद्याला बाजार भाव मिळेल की नाही, उत्पादन खर्चही सुटणार नाही त्यामुळे अजुन कशात अजून कशाला तोट्यात जायचं अन् उद्या भाव वाढले तर..असे प्रश्न शेतकऱ्यांची द्विधावस्था करत आहेत.शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक शेतात तसेच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरपुडी परिसरातील येथील विजय काशिद या शेतकऱ्यांने आपल्या दीड एकर उभ्या कांद्याच्या पिकात शेळया मेंढ्या चरावयाला सोडून पीक नष्ट केले. बहुतेक शेतकरी कांदा पिकाला बाजार भाव नसल्यामुळे काढणी करण्याचे काम थांबवले आहे. पीक काढणीला आले मात्र बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट मातीत गेले आहे. ....................................................माझा दीड एकर शेतात कांदा पीक होते. मागील महिनाभरापासून बाजारभावात सुधारणा झाली नाही. शेतीची मशागत, कांदा रोपे लागवड, खुरपणी, औषधे फवारणी यामध्ये ७० हजार रुपये पाण्यात गेले आहे. तसेच पिकांची काढणी,भरणी, वाहतुक त्यातच बाजार भाव नसल्यामुळे हा खर्च पुन्हा तोट्याचा ठरणार आहे. मागील वर्षी १५ ते २० रुपये किलो बाजारभाव मिळाला होता. सध्या किलोला ५ ते ६ रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आज दिड एकर क्षेत्रावर शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.विजय काशिद, शेतकरी 

टॅग्स :KhedखेडonionकांदाGovernmentसरकार