शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी चिंतातूर, पाण्याअभावी रब्बी हंगामही संकटात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 06:55 IST

पाऊस पेरणी नाहीच : मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक

पुणे : शेवटच्या टप्प्यात पाठ फिरविल्याने राज्याची पावसाची सरासरी ७८ टक्क्यांपर्यंत आली आहे. मराठवाड्यात २८ टक्केच पाणीसाठा असल्याने खरिपाबरोबरच रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. नागपूर विभागात ५१.४९ टक्के, अमरावती ५८.१५ व नाशिकमध्ये ६४.९९ टक्केच पाणीसाठा असल्याने रब्बी हंगाम संकटात येऊ शकेल.

नाशिक, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, वर्धा, सोलापूर जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची शक्यता नाही. रब्बीचे क्षेत्र ५४ लाख ७५ हजार हेक्टर असून, त्यातील ३० लाख हेक्टर औरंगाबाद, लातूर व अमरावती विभागात येते. येथेच पाणी कमी असल्याने रब्बी हंगाम धोक्यात आहे.

मराठवाड्यात मोठ्या प्रकल्पांत क्षमता ४ हजार ९८ दशलक्ष घनमीटर असली तरी १ हजार २२९ दशलक्ष घनमीटर साठा (२९.९९ टक्के) आहे. गेल्या वर्षी तो ७४.९२ टक्के होता. नाशिक प्रदेशात २ ८६७ दशलक्ष घनमीटर (७६.६८ टक्के) साठा सध्या आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ८९.२८ टक्के होते. येथील निळवंडे-२ २३२ पैैकी १८८, मुळा ६०९ पैकी ४१७ आणि वाकी धरणात ७१ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या ६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.अमरावतीत उर्ध्व वर्धा क्षमतेच्या निम्मेच भरले असून, नेळगंगा व पेनटाकळीत १८.३३ व १९.३८ टक्के पाणीसाठा आहे. जळगावमधील इसापूरमध्ये ६७.०९ टक्के पाणीसाठा असल्याने काहीसा दिलासा आहे. पण विदर्भात नागपूरच्या गोसी खुर्दमध्ये ५०.८७ टक्के, बावनथडीत ३०.३५ टक्के व इटियाडोह येथे ५७.५९ टक्के पाणी शिल्लक आहे.रब्बीचे सरासरी क्षेत्र हेक्टरमध्येविभाग ज्वारी गहू मका हरभरा अन्नधान्यऔरंगाबाद ३,९२,२६३ १,०५,६२० १४,१४९ १,२०,५८९ ६,३४,३३४लातूर ४,९६,०६९ १,७७,९०० ५,५६० ३,२४,०४६ १०,०८,८६१अमरावती १४,८०१ १,८०,८०० १२,२०४ ३,४२,१४३ ५,५०,७३८आता शक्यता नाहीराज्याच्या मराठवाडा, विदर्भ, खान्देशसह अन्य भागांत आता मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रब्बीवर परिणाम होण्याची भीती आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस