शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

शेतकरी चिंतातूर, पाण्याअभावी रब्बी हंगामही संकटात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 06:55 IST

पाऊस पेरणी नाहीच : मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक

पुणे : शेवटच्या टप्प्यात पाठ फिरविल्याने राज्याची पावसाची सरासरी ७८ टक्क्यांपर्यंत आली आहे. मराठवाड्यात २८ टक्केच पाणीसाठा असल्याने खरिपाबरोबरच रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. नागपूर विभागात ५१.४९ टक्के, अमरावती ५८.१५ व नाशिकमध्ये ६४.९९ टक्केच पाणीसाठा असल्याने रब्बी हंगाम संकटात येऊ शकेल.

नाशिक, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, वर्धा, सोलापूर जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची शक्यता नाही. रब्बीचे क्षेत्र ५४ लाख ७५ हजार हेक्टर असून, त्यातील ३० लाख हेक्टर औरंगाबाद, लातूर व अमरावती विभागात येते. येथेच पाणी कमी असल्याने रब्बी हंगाम धोक्यात आहे.

मराठवाड्यात मोठ्या प्रकल्पांत क्षमता ४ हजार ९८ दशलक्ष घनमीटर असली तरी १ हजार २२९ दशलक्ष घनमीटर साठा (२९.९९ टक्के) आहे. गेल्या वर्षी तो ७४.९२ टक्के होता. नाशिक प्रदेशात २ ८६७ दशलक्ष घनमीटर (७६.६८ टक्के) साठा सध्या आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ८९.२८ टक्के होते. येथील निळवंडे-२ २३२ पैैकी १८८, मुळा ६०९ पैकी ४१७ आणि वाकी धरणात ७१ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या ६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.अमरावतीत उर्ध्व वर्धा क्षमतेच्या निम्मेच भरले असून, नेळगंगा व पेनटाकळीत १८.३३ व १९.३८ टक्के पाणीसाठा आहे. जळगावमधील इसापूरमध्ये ६७.०९ टक्के पाणीसाठा असल्याने काहीसा दिलासा आहे. पण विदर्भात नागपूरच्या गोसी खुर्दमध्ये ५०.८७ टक्के, बावनथडीत ३०.३५ टक्के व इटियाडोह येथे ५७.५९ टक्के पाणी शिल्लक आहे.रब्बीचे सरासरी क्षेत्र हेक्टरमध्येविभाग ज्वारी गहू मका हरभरा अन्नधान्यऔरंगाबाद ३,९२,२६३ १,०५,६२० १४,१४९ १,२०,५८९ ६,३४,३३४लातूर ४,९६,०६९ १,७७,९०० ५,५६० ३,२४,०४६ १०,०८,८६१अमरावती १४,८०१ १,८०,८०० १२,२०४ ३,४२,१४३ ५,५०,७३८आता शक्यता नाहीराज्याच्या मराठवाडा, विदर्भ, खान्देशसह अन्य भागांत आता मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रब्बीवर परिणाम होण्याची भीती आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस