शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी चिंतातूर, पाण्याअभावी रब्बी हंगामही संकटात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 06:55 IST

पाऊस पेरणी नाहीच : मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक

पुणे : शेवटच्या टप्प्यात पाठ फिरविल्याने राज्याची पावसाची सरासरी ७८ टक्क्यांपर्यंत आली आहे. मराठवाड्यात २८ टक्केच पाणीसाठा असल्याने खरिपाबरोबरच रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. नागपूर विभागात ५१.४९ टक्के, अमरावती ५८.१५ व नाशिकमध्ये ६४.९९ टक्केच पाणीसाठा असल्याने रब्बी हंगाम संकटात येऊ शकेल.

नाशिक, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, वर्धा, सोलापूर जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची शक्यता नाही. रब्बीचे क्षेत्र ५४ लाख ७५ हजार हेक्टर असून, त्यातील ३० लाख हेक्टर औरंगाबाद, लातूर व अमरावती विभागात येते. येथेच पाणी कमी असल्याने रब्बी हंगाम धोक्यात आहे.

मराठवाड्यात मोठ्या प्रकल्पांत क्षमता ४ हजार ९८ दशलक्ष घनमीटर असली तरी १ हजार २२९ दशलक्ष घनमीटर साठा (२९.९९ टक्के) आहे. गेल्या वर्षी तो ७४.९२ टक्के होता. नाशिक प्रदेशात २ ८६७ दशलक्ष घनमीटर (७६.६८ टक्के) साठा सध्या आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ८९.२८ टक्के होते. येथील निळवंडे-२ २३२ पैैकी १८८, मुळा ६०९ पैकी ४१७ आणि वाकी धरणात ७१ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या ६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.अमरावतीत उर्ध्व वर्धा क्षमतेच्या निम्मेच भरले असून, नेळगंगा व पेनटाकळीत १८.३३ व १९.३८ टक्के पाणीसाठा आहे. जळगावमधील इसापूरमध्ये ६७.०९ टक्के पाणीसाठा असल्याने काहीसा दिलासा आहे. पण विदर्भात नागपूरच्या गोसी खुर्दमध्ये ५०.८७ टक्के, बावनथडीत ३०.३५ टक्के व इटियाडोह येथे ५७.५९ टक्के पाणी शिल्लक आहे.रब्बीचे सरासरी क्षेत्र हेक्टरमध्येविभाग ज्वारी गहू मका हरभरा अन्नधान्यऔरंगाबाद ३,९२,२६३ १,०५,६२० १४,१४९ १,२०,५८९ ६,३४,३३४लातूर ४,९६,०६९ १,७७,९०० ५,५६० ३,२४,०४६ १०,०८,८६१अमरावती १४,८०१ १,८०,८०० १२,२०४ ३,४२,१४३ ५,५०,७३८आता शक्यता नाहीराज्याच्या मराठवाडा, विदर्भ, खान्देशसह अन्य भागांत आता मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रब्बीवर परिणाम होण्याची भीती आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस