शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्ह्यातील ६ गावात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचा कर्जमाफी योजनेला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:51 IST

आतापर्यंत ४० हजार ९१७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना तब्बल १२०० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार

पुणे : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जोरदार अंमलबजावणीजिल्ह्यात सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली आहे. या गावांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देताना अडथळा निर्माण झाली असून, ही सहा गावे वगळून अन्य गावांना पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील मुर्डी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोवावाडी ग्रामपंचायती मधील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात जाहीर होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.     राज्यसह जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शुक्रवार (दि.२८) पासून शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील अन्य सर्व गावांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना तब्बल १२०० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांत गावागावांमध्ये दिवस-रात्र कर्जमाफी योजनेचे काम सुरू आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आणि त्यानंतर कर्जमाफीचे खाते प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ९१७ शेतकऱ्यांची बँक खाती प्रमाणीकरण करून झाली असून, येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.     जिल्ह्यात बारामती तालुक्यातील मुर्डी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोवावाडी ग्रामपंचायतीसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ३० मार्चला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या या गावांमध्ये निवडणूक आयारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता असलेल्या भागात कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ देता येत नाही. त्यानुसार या गावांमध्ये आता कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागले. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिसऱ्या यादीमध्ये या सहा गावांतील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक