शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गावातील कचऱ्यासाठी ग्रामस्थाने दिले स्वत:चे शेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:58 IST

गेल्या दहा-बारा वर्षांपासून कुंजीरवाडीची (ता. हवेली) डोकेदुखी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरत असलेल्या कचºयाचा ढीग हटविण्यासाठी एका ग्रामस्थाने स्वत:च्या शेतातील जमीन दिली.

थेऊर - गेल्या दहा-बारा वर्षांपासून कुंजीरवाडीची (ता. हवेली) डोकेदुखी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरत असलेल्या कचºयाचा ढीग हटविण्यासाठी एका ग्रामस्थाने स्वत:च्या शेतातील जमीन दिली. त्यामुळे अखेर कच-याचा ढीग कायमस्वरूपी हटविण्यात आला. सरपंच सुनीता धुमाळ यांनी पुढाकार घेत जेसीबी आणि डंपरच्या साह्याने ही कचराकुंडी हलविण्यास लावले.गावठाण परिसरामध्ये असलेल्या या कचºयामुळे गावामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय दर दोन-तीन महिन्यालाच या कच-याला आग लागून पेटलेला कचरा उडून अनेकांच्या घरात अंगणात पडत असल्याने त्याचा धोका वाढला होता. यावर अनेक वेळा तक्रारीही झाल्या परंतु हा कचरा नेमका कुठे हलवायचा हा प्रश्न होता. मात्र गावकºयांशी चर्चा केल्यावर गावातील धनश्री कार्यालयाचे मालक प्रभाकर धुमाळ यांनी कचरा टाकण्यासाठी स्वत:च्या मालकीची शेतजमीन दिल्यामुळे गावाचा हा कचरा प्रश्न मिटला आहे.ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे नागरिकांत तसेच शालेय विद्यार्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच सुनीता धुमाळ यांनी उपसरपंच गोरख तुपे, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, माजी सरपंच सचिन तुपे, माजी सरपंच संतोष कुंजीर, माजी सरपंच अनुराधा कुंजीर, श्रीनाथचे चेअरमन संदीप धुमाळ, श्रीराम सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुरेश गाढवे, राहुल धुमाळ, भाऊसाहेब कुंजीर, दिलीप कुंजीर, गुलाब गाढवे, संदीप शिवाजी धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य नाना अंकुश कुंजीर, ग्रामसेवक गळवे, यांच्याशी विचारविनिमय करुन हा कचरा उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.४कुंजीरवाडी हे पुणे-सोलापूर महामार्गावरील वेगाने वाढत चाललेले बाजार ठिकाण आहे. पुणे शहरालगत असल्याने येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, येथील कचरा यापूर्वी गावातील मुख्य वस्तीत गोळा केला जात होता.बाजूला एक माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गावाची स्मशानभूमी असल्याने येथील विद्यार्थ्यांना तसेच दशक्रिया व अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधी व धुराचा कायमच त्रास सहन करावा लागत होता.

टॅग्स :Puneपुणे