शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

शेतकरी अपघात विम्याचे दावे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 18:44 IST

राज्य शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात असून त्यात जिल्ह्यातील ५९ शेतक-यांचे दावे कंपनीकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १४४ पैकी ६५ दावे मंजूर १० ते ७५ वयोगटातील शेतक-याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

पुणे: राज्य शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात असून त्यात जिल्ह्यातील ५९ शेतक-यांचे दावे कंपनीकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. तर १५ दाव्यांवर अपूर्ण कागदपत्रांच्या अभावी कार्यवाही होत नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, येत्या महिना अखेरीस संबंधित दाव्यांची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रस्त्यावरील अपघात,रेल्वे अपघात,पाण्यात बुडून मृत्यू,जंतूनाशक किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा,विजेधा धक्का,वीज पडून मृत्यू, खून, उंचीवरून पडून झालेला अपघात किंवा सर्पदंश किंवा इतर जनावरांच्या चाव्यामुळे झालेला मृत्यू तसेच दंगल वा कोणत्याही कारणामुळे शेतक-याचा अपघात झाल्यास १० ते ७५ वयोगटातील शेतक-याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ११४ शेतक-यांचे दावे शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यात जुन्नर मधील २६,बारामती व इंदापूरातील प्रत्येकी १८ ,शिरूर व दौंड मधील प्रत्येकी १३ आणि मावळ तालुक्यातील १५ दाव्यांचा समावेश आहे.तर इतर तालुक्यातील शेतक-यांचे दावे ही कंपनीकडे दाखल करण्यात आले आहेत.अपघातामुळे डोळे अथवा अवयव निकामी झाल्यास विमा योजनेचा लाभा दिला जातो. त्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावे लागतात.मात्र,१५ शेतक-यांनी अपूर्ण कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांच्या दाव्यांवरील कार्यवाही थांबली आहे.परंतु,जिल्ह्यातील १४४ पैकी ६५ दावे मंजूर करण्यात आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी