शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

पवार कुटुंबातील व्यक्तीच म्हणते, 'आणखी पाच वर्षं हवं मोदी सरकार'; खासदाराने उडवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 15:58 IST

केंद्रात, राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. व्यापारी,नोकरदारांसह शेतकरी वर्ग देखील या शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे अशी टीका विरोधक करीत आहेत.

बारामती - केंद्रात, राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. व्यापारी,नोकरदारांसह शेतकरी वर्ग देखील या शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे अशी टीका विरोधक करीत आहेत. या विरोधकांमध्ये राष्ट्रवादी अग्रभागी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाविरोधात विविध आंदोलनाच्या माध्यमातुन टीका सुरू केली आहे. मात्र,देशाच्या विकासासाठी आणखी पाच वर्ष देशात ‘मोदी सरकार’ असावे, अशी इच्छा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या पवार  कुटुंबियातील एका जाणकाराने व्यक्त केली आहे. खासदार अमर साबळे यांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या सभेत हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे पवार कुटुंबियातील ‘तो’ सदस्य कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दिवाळीच्या तोंडावर केलेली राजकीय फटाकेबाजी उपस्थितांनी कार्यक्रमात अनुभवली. मात्र खासदार साबळे यांची फटाकेबाजी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. यावेळी खासदार साबळे म्हणाले, पुणे येथील उद्योगपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्र्यासमवेत आपण उपस्थित होतो. आमच्या गप्पा सुरु होत्या,यावेळी तेथे पवार कुटुंबातील एक जाणकार सुज्ञ व्यक्ती उपस्थित होती. त्या व्यक्तीने देशाची विकासाची वाटचाल चांगली आहे. ही वाटचाल सुरू ठेवण्यासाठी आणखी पाच वर्ष  देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार  असावे, असे मत व्यक्त केले. त्यावर त्या व्यक्तीकडे पाहुन मी हसलो. त्यानंतर देखील त्या मतावर ठाम राहत त्या व्यक्तिने ‘मी पवार कुटुंबियांपैकी एक आहे, मी खोटे बोलत नाही. या देशात विकास होण्यासाठी देशात ‘मोदी सरकार’ असण्याची इच्छा पवार कुटूंबातील त्या व्यक्तिने व्यक्त केल्याचे  खासदार साबळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदी सरकार खटकत असताना मोदी सरकार  पुन्हा सत्तेवर येण्याची इच्छा बाळगणारा पवार कुटुंबियातील ‘तो’ सुज्ञ व्यक्ति कोण याची जोरदार चर्चा रंगली. यावेळी खासदार साबळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतची आठवण सांगून पवार या शेतकरी विरोधी असल्याची टीका केली. पवार यांच्या समवेत एका विमानप्रवासात शेजारी बसण्याचा प्रसंग आला.त्यावेळी सहज गप्पा मारताना माझ्यातील पत्रकार जागा झाला. त्यातून पवार यांना ‘साहेब, तुम्ही दहा वर्ष कृषिमंत्री आहात, मग तुम्ही स्वामिनाथन आयोग का लागु केला नाही,असा प्रश्न विचारला.त्यावर ज्येष्ठ नेते पवार यांनी देशात २९ टक्केशेतीमालाचे उत्पादक  आहेत. तर ७१ टक्के खाणारे आहेत.त्यामुळे २९ टक्के लोकांना न्याय देताना ७१ टक्के लोकांचे काय होईल, असे उत्तर दिले. पवार माझ्याकडे पाहुन हसले.या प्रसंगावरुन शेतकऱ्यांचे कैवारी म्हून घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नसल्याचे दिसुन येते. मात्र ज्यांना शेतकऱ्यांचे काही कळत नाही अशी टीका करतात. मात्र मोदींनी उत्पादक आणि खाणाऱ्यांचाही देखील विचार केला. स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला दीडपट भाव मोदी यांनी दिल्याचा दावा साबळे यांनी केला. त्यामुळे खासदार साबळे  यांच्या  फटाकेबाजीची चर्चा चांगलीच रंगली. ७० वर्षात न झालेले निर्णय मोदींनी घेतल्याचे साबळे म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती