शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

पवार कुटुंबातील व्यक्तीच म्हणते, 'आणखी पाच वर्षं हवं मोदी सरकार'; खासदाराने उडवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 15:58 IST

केंद्रात, राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. व्यापारी,नोकरदारांसह शेतकरी वर्ग देखील या शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे अशी टीका विरोधक करीत आहेत.

बारामती - केंद्रात, राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. व्यापारी,नोकरदारांसह शेतकरी वर्ग देखील या शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे अशी टीका विरोधक करीत आहेत. या विरोधकांमध्ये राष्ट्रवादी अग्रभागी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाविरोधात विविध आंदोलनाच्या माध्यमातुन टीका सुरू केली आहे. मात्र,देशाच्या विकासासाठी आणखी पाच वर्ष देशात ‘मोदी सरकार’ असावे, अशी इच्छा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या पवार  कुटुंबियातील एका जाणकाराने व्यक्त केली आहे. खासदार अमर साबळे यांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या सभेत हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे पवार कुटुंबियातील ‘तो’ सदस्य कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दिवाळीच्या तोंडावर केलेली राजकीय फटाकेबाजी उपस्थितांनी कार्यक्रमात अनुभवली. मात्र खासदार साबळे यांची फटाकेबाजी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. यावेळी खासदार साबळे म्हणाले, पुणे येथील उद्योगपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्र्यासमवेत आपण उपस्थित होतो. आमच्या गप्पा सुरु होत्या,यावेळी तेथे पवार कुटुंबातील एक जाणकार सुज्ञ व्यक्ती उपस्थित होती. त्या व्यक्तीने देशाची विकासाची वाटचाल चांगली आहे. ही वाटचाल सुरू ठेवण्यासाठी आणखी पाच वर्ष  देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार  असावे, असे मत व्यक्त केले. त्यावर त्या व्यक्तीकडे पाहुन मी हसलो. त्यानंतर देखील त्या मतावर ठाम राहत त्या व्यक्तिने ‘मी पवार कुटुंबियांपैकी एक आहे, मी खोटे बोलत नाही. या देशात विकास होण्यासाठी देशात ‘मोदी सरकार’ असण्याची इच्छा पवार कुटूंबातील त्या व्यक्तिने व्यक्त केल्याचे  खासदार साबळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदी सरकार खटकत असताना मोदी सरकार  पुन्हा सत्तेवर येण्याची इच्छा बाळगणारा पवार कुटुंबियातील ‘तो’ सुज्ञ व्यक्ति कोण याची जोरदार चर्चा रंगली. यावेळी खासदार साबळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतची आठवण सांगून पवार या शेतकरी विरोधी असल्याची टीका केली. पवार यांच्या समवेत एका विमानप्रवासात शेजारी बसण्याचा प्रसंग आला.त्यावेळी सहज गप्पा मारताना माझ्यातील पत्रकार जागा झाला. त्यातून पवार यांना ‘साहेब, तुम्ही दहा वर्ष कृषिमंत्री आहात, मग तुम्ही स्वामिनाथन आयोग का लागु केला नाही,असा प्रश्न विचारला.त्यावर ज्येष्ठ नेते पवार यांनी देशात २९ टक्केशेतीमालाचे उत्पादक  आहेत. तर ७१ टक्के खाणारे आहेत.त्यामुळे २९ टक्के लोकांना न्याय देताना ७१ टक्के लोकांचे काय होईल, असे उत्तर दिले. पवार माझ्याकडे पाहुन हसले.या प्रसंगावरुन शेतकऱ्यांचे कैवारी म्हून घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नसल्याचे दिसुन येते. मात्र ज्यांना शेतकऱ्यांचे काही कळत नाही अशी टीका करतात. मात्र मोदींनी उत्पादक आणि खाणाऱ्यांचाही देखील विचार केला. स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला दीडपट भाव मोदी यांनी दिल्याचा दावा साबळे यांनी केला. त्यामुळे खासदार साबळे  यांच्या  फटाकेबाजीची चर्चा चांगलीच रंगली. ७० वर्षात न झालेले निर्णय मोदींनी घेतल्याचे साबळे म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती