शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानांची कुटुंबे घेणार दत्तक ; प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 20:12 IST

पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतरचा हवाई हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. मात्र, जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे होणार हाल, याबाबत फारसे बोलले जात नाही. यातील गांभीर्य लक्षात घेऊन शहीद झालेल्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिका-यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे : पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतरचा हवाई हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. मात्र, जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे होणार हाल, याबाबत फारसे बोलले जात नाही. यातील गांभीर्य लक्षात घेऊन शहीद झालेल्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिका-यांनी पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय अधिका-यांकडूनही या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची यादी तयार करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यविषयक, मुलांचे शाळा प्रवेश आणि शेतीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या, त्यांचे दररोजच्या जगण्यातील प्रश्न जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ११५ शहीद जवानांच्या कुटुंबांचा मेळावा शुक्रवारी (८ मार्च) आयोजित करण्यात आला आहे. सुरज मांढरे यांनी यासंदर्भात सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनीही या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रश्न जाणून घेत त्यांची जलदगतीने सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालकत्वासंदर्भात माहिती देताना सुरज मांढरे म्हणाले, ‘सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून सैनिक देशासाठी लढत असतात. दहशतवादी हल्ला, सीमेवरील घुसघोरी, जवान शहीद झाल्याच्या घटना घडल्यावरच आपल्याला सैनिकांबद्दल प्रेम वाटू लागते. युध्दज्वर ओसरला की आपल्याला शहीद जवानांचा विसर पडतो. मात्र, त्यांच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढावते, याचा विचार केला जात नाही. यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी या उद्देशातून काही सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. आम्ही काही अधिकारी स्वयंस्फूर्तीने शहीद जवानांची कुटुंबे दत्तक घेणार आहोत. वरिष्ठ अधिकारी या कुटुंबीयांचे पालक झाल्याने या प्रश्नांची सोडवणूक जलद गतीने होईल. शहीद जवानांच्या कुटुंबीयांपैकी यापैकी काहीजणांशी संपर्क साधला असता त्यांना या कल्पनेमुळे खूप समाधान वाटले.’

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPuneपुणे