शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

देशभक्तीच्या नावाखाली खोट्या राष्ट्रवादाला खतपाणी : एन.राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 11:35 IST

हिंदू राष्ट्र उभारणीचा सिद्धांत समान हक्क, वागणूक व न्याय या मुलभूत तत्वांना धूर्तपणे नाकारतो.

ठळक मुद्देडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान आयोजित

पुणे : भारत हे हिंदू राष्ट्र असून, हिंदुत्व हीच तिची ओळख असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय नागरिकत्वाच्या व संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेवर घाला घालत आहे. हा हिंदू राष्ट्र उभारणीचा सिद्धांत समान हक्क, वागणूक व न्याय या मुलभूत तत्वांना धूर्तपणे नाकारतो. यासाठी मुस्लिमांविरोधात गरळ ओकणे व पद्धतशीरपणे सोईच्या धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करण्याचे मार्ग अवलंबले  जात आहेत. भारतीय संस्कृतीला व सर्व भारतीयांना हिंदू करून हिंदुत्वाला वैधता बहाल केली जात आहे, अशा शब्दातं ' द हिंदू ग्रृप'  चे संचालक एन.राम यांनी  संघाच्या हिंदुत्व विचारसरणीवर कडाडून टीका केली. हुकुमशाहीला बळ देणारे राष्ट्रीय ऐक्य व देशभक्ती यांचा वापर करीत खोट्या राष्ट्रवादाला व जातीयवादाला खतपाणी घातले जात असल्याचेही ते म्हणाले.    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. एन.राम यांचे वर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने (जनसमूहाच्या वंचिततेचे वास्तव, धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने) याविषयावर डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळीडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रश्न तुमचा आणि उत्तर दाभोलकरांचे आणि ठरलं डोळस व्हायचं या दोन पुस्तकांच्या हिंदी अनुवादांचे लोकार्पण तसेच विवेकाचा आवाज या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहा भाषणांचे शब्दांकन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.    यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार तसेच अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, डॉ. शैला दाभोलकर, नंदिनी जाधव उपस्थित होते.     हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांच्याच इतर काही अतिरेकी समविचारी संघटनेच्या पाठिंब्यामुळे या पक्षाला न भूतो न भविष्यती असे बहुमत मिळाले. त्यामुळेच आत्तापर्यंतच्या स्वातंत्र्याबददलच्या अंगळवणी पडलेल्या विचारसरणीला छेद देऊन सामाजिक-राजकीय कार्यक्रमांसाठी एक नवीन विचारसरणी घेऊन सत्ताधारी पक्ष मैदानात उतरला आहे, असे सांगून एन.राम पुढे म्हणाले, सर्वांना समान तत्वावर वागवणारी धर्मनिरपेक्षता न्याय या मूल्यावर आधारल्याशिवाय तिचा उत्कर्ष साधता येणार नाही. सोईच्या धर्मनिरपेक्षतेच्या रणनीतीचा वापर करून राजकीय संघटन करण्यासाठी फसव्या राष्ट्रवादाचा बुरखा पांघरून अशा संघटनांना लोकमान्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आपल्यातील उपजत असलेल्या वैज्ञानिक जाणिवा व विवेकवादाशिवाय जातीयवाद, धार्मिक मूलतत्ववाद, धर्मांधता व अतिरेकीपणा यांच्या विरोधातील लढा यशस्वी होणार नाही.     हेमंत गोखले म्हणाले, जे कुणी सरकारविरोधात बोलते त्यांना अडवले जाते ही गोष्ट देशासाठी नक्कीच भूषणावह नाही. ब्रिटीशांच्या काळात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे कारागृहात ठेवण्यात आले होते. तिचं परिस्थिती उदभवेल की काय? अशी भीती वाटू लागली आहे. पहलू खान प्रकरणात जसे मारेकरी सुटले तसे डॉ. दाभोलकरांच्या केसमध्ये होऊ नये. ----------------------------------------------------------भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या दडपणाखाली आज भारतात प्रसारमाध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच दडपणाखाली आहे. यातून सामान्य नागरिकही सुटू शकलेले नाहीत. साधी फेसबुक पोस्ट करणा-या नागरिकांनाही अटक केली जाते. एकेकाळी राज्य असणा-या जम्मू आणि काश्मिरातील सर्व जनतेला एका मोठ्या कालखंडासाठी माहितीपासून दूर ठेवले गेले. त्यांचे इंटरनेट बंद केले. हे कलम 19 चे उघड उघड उल्लंघन होते. इतके मोठे पाऊल उचलण्याबाबत सरकारने कोणतेही स्पष्टीकरण देणे आवश्यक समजले नाही अशी टीकाही एन. राम यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरHindutvaहिंदुत्वRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघGovernmentसरकार