शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

जिरायती भागात तीव्र चाराटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:12 IST

जनावरांना चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

काºहाटी : पावसाने दडी मारल्याने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण चाराटंचाई जाणवत आहे. जनावरांना चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. योजनांमधून पाझरतलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बारामतीचा जिरायती भाग म्हणून ओळखला जाणारा काराटी, जळगाव सुपे, जळगाव क. प., भिलारवाडी, माळवाडी, फौंडवाडा, बाबुर्डी, देवळगाव रसाळ आदी भागांत या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी जिवापाड सांभाळलेली जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पडला आहे. त्यांना चारा कोठून आणायचा, या विवंचनेने शेतकºयांची झोप उडाली आहे.यंदाच्या उन्हाळ्यात हवालदिल झालेल्या शेतकºयाला मोसमी पूर्व पाऊस पडेल, खरीप हंगामात पिके घेऊन कुटुंबाला तसेच पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना चारापिके घेऊन प्रश्न मिटविण्याचा मानस होता. मात्र, अतिशय बिकट परिस्थितीला सामना करण्याची वेळ शेतकºयावर आले आहे.शेतात पिके नाहीत, विहिरींना पाणी नाही, बंधारे- पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले, तरीदेखील थोडासा तरी पाऊस पडेल, या आशेवर बसलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. या भागात पाच वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असल्याने शेतकरीवर्गात कमालीची नाराजी पसरली आहे.शासनाने जनाई-शिरसाई व पुरंदर उपसा योजनेतून पाझर तलाव व बंधारे भरून दिले, तर या भागातील दुष्काळ काही प्रमाणात नाहीसा होईल. मात्र तरीदेखील शासन पाऊल उचलत नसल्याची खंत येथील शेतकरी शिवाजी वाबळे, उद्धव वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरी