शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागात तीव्र चाराटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:12 IST

जनावरांना चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

काºहाटी : पावसाने दडी मारल्याने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण चाराटंचाई जाणवत आहे. जनावरांना चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. योजनांमधून पाझरतलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बारामतीचा जिरायती भाग म्हणून ओळखला जाणारा काराटी, जळगाव सुपे, जळगाव क. प., भिलारवाडी, माळवाडी, फौंडवाडा, बाबुर्डी, देवळगाव रसाळ आदी भागांत या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी जिवापाड सांभाळलेली जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पडला आहे. त्यांना चारा कोठून आणायचा, या विवंचनेने शेतकºयांची झोप उडाली आहे.यंदाच्या उन्हाळ्यात हवालदिल झालेल्या शेतकºयाला मोसमी पूर्व पाऊस पडेल, खरीप हंगामात पिके घेऊन कुटुंबाला तसेच पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना चारापिके घेऊन प्रश्न मिटविण्याचा मानस होता. मात्र, अतिशय बिकट परिस्थितीला सामना करण्याची वेळ शेतकºयावर आले आहे.शेतात पिके नाहीत, विहिरींना पाणी नाही, बंधारे- पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले, तरीदेखील थोडासा तरी पाऊस पडेल, या आशेवर बसलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. या भागात पाच वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असल्याने शेतकरीवर्गात कमालीची नाराजी पसरली आहे.शासनाने जनाई-शिरसाई व पुरंदर उपसा योजनेतून पाझर तलाव व बंधारे भरून दिले, तर या भागातील दुष्काळ काही प्रमाणात नाहीसा होईल. मात्र तरीदेखील शासन पाऊल उचलत नसल्याची खंत येथील शेतकरी शिवाजी वाबळे, उद्धव वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरी