शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

उसाचा तोडा लांबला

By admin | Updated: December 29, 2014 00:53 IST

मावळ तालुक्यात उसाचा तोडा लांबला आहे. तोडणीस उशीर झाल्याने वजन कमी होवूून तसेच, अनेक कारणांमुळे उस उत्पादन घटण्याच्या

पिंपरी : मावळ तालुक्यात उसाचा तोडा लांबला आहे. तोडणीस उशीर झाल्याने वजन कमी होवूून तसेच, अनेक कारणांमुळे उस उत्पादन घटण्याच्या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कोणाकडे पहावे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. शेतमजूरांच्या कमतरतेमुळे तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी तरकारी पिक लागवडीखालील क्षेत्र कमी केले. या वर्षी ऊस लागवडीखालील क्षेत्र ७ हजार ६७० हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्यातून कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यास साडेपाच लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला आहे. या उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांकडून ढासळत असल्याचा प्रत्यय येत आहे. काही शेतकऱ्यांचा ऊस तुटण्याची तारीख उलटून दीड महिना झाला. तरी अद्याप तोडणी झालेली नाही. जवळीक असणारे सुखीआपलाच ऊस तोडावा म्हणून अनेक शेतकरी सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांपैकी काही शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात आहे. याचबरोबर ज्या धनाढ्य शेतकऱ्यांची व्यवस्थापनाशी जवळीक आहे, अशांच्याच शेतामधील ऊसाची तोडणी लवकर केली जाते. आमच्या शेतामधील ऊस दीड ते दोन महिने होऊनही तोडला जात नाही. विशेषत: उन्हाळ्यापर्यंत उशीर झाल्यास उसाला तुरे येतात. गाभ्याचा भाग पोकळ होवून २० टक्क्यांपर्यंत वजन घटते. त्यामुळे नुकसान होत असल्याची कैफियत शेतकरी मांडत आहेत.(प्रतिनिधी)