शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:29 IST

आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी, असे मत डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे१० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित अवयवदान प्रसार अभियानाचा समारोपग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा : चाफेकर

पुणे : आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी. त्यासाठी अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.वंचित विकास, शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट व हॅन्डरायटिंग अ‍ॅनालिसिस रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या वतीने १० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान प्रसार अभियानाचा समारोप डॉ. चाफेकर यांच्या उपस्थित सारसबाग गणपती मंदिराच्या परिसरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अभियानाचे प्रमुख डॉ. मधुसूदन घाणेकर, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर डॉ. सुधीर कुलाल, विजय दामले आदी उपस्थित होते.डॉ. चाफेकर म्हणाले, ‘ग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी पुण्याच्या विविध भागात फिरून अवयवदानाचे महत्त्व सांगण्यात आले. यातून हजारो लोकांपर्यंत त्यांनी अवयवदानाचा संदेश पोहोचवला आहे. प्रत्येकाने अवयदानाचा गांभीर्याने विचार केल्यास अनेकांना नव्याने आयुष्य जगात येईल. आपले अस्तित्व इतरांच्या रूपाने कायम राहील.’डॉ. घाणेकर म्हणाले, ‘अवयवदानाबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी प्रसार होणे गरजेचे आहे. या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी अवयवदानात योगदान दिले आहे, अशा व्यक्तींच्या वारसांचा सन्मान केला पाहिजे. येत्या काळात याबाबत परिषद भरवून त्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न आहे.’मीना कुर्लेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर कुलाल यांनी आभार मानले. 

टॅग्स :Organ donationअवयव दानPuneपुणे