शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या निर्यातीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST

शेतकरी संघटनेची मागणी अन्यथा शेतकरी, कामगारांना भूर्दंड सहन करावा लागणार शेतकरी संघटनांची मागणी: उत्पादकांना भुर्दंड सहन करावा लागणार बारामती: ...

शेतकरी संघटनेची मागणी

अन्यथा शेतकरी, कामगारांना

भूर्दंड सहन करावा लागणार

शेतकरी संघटनांची मागणी: उत्पादकांना भुर्दंड सहन करावा लागणार

बारामती: साखर निर्यातीस दोन महिने उशीर झालेला आहे. जागतिक बाजार भारताच्या साखरेची वाट पाहत आहे. या परिस्थितीचा फायदा लगोलग उचलला नाहीतर येत्या दोन तीन महिन्यामध्ये जागतिक बाजारात ब्राझिलची साखर उपलब्ध होईल, याचा थेट फटका ऊस उत्पादकाला बसणार आहे. साखरेच्या निर्यातीचा निर्णय केंद्र सरकार घेत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी व साखर कामगारांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीस केंद्र सरकारने तातडीने परवाणगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, यंदा देशात ३२० लाख मे. टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षाचा २२ लाख मे. टन साखरसाठा उपलब्ध आहे. याचाच अर्थ चालू साखर हंगाम संपल्यानंतर तो ३८२ लाख मे. टन इतका होऊन देशाची गरज २५० लाख मे टनाची असून म्हणजे हा हंगाम संपल्यानंतर १३२ लाख मे टन साखरसाठा शिल्लक राहील. तो देशाच्या गरजेच्या ६० टक्के इतका आहे. पुढील हंगाम सन २१-२२ मध्ये सुद्धा साखरेचा हंगाम बंपर उत्पादन घेण्याचा आहे. सन १९९७ पर्यंत जागतिक बाजारात साखरेची निर्यात करणारा भारत देश प्रमुख होता. अनेक जगातील राष्ट्रे आपल्या साखरेची कायम स्वरूपी ग्राहकदेश होते. परंतु, नंतर आपण निर्यात बंद करून आपण उलटपक्षी गरज नसताना साखरेची आयात केलेली आहे. त्यामुळे देशातील ऊस उत्पादकांना व साखर कामगारांना त्याचा भूर्दंड सोसावा लागलेला आहे. निर्यात साखर न झालमुळे देशात साखरेचे दर पडे राहतील. साखर साठ्यावरील कर्ज - व्याज काढणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व साखर कामगार यांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे.

चौकट..................

साखर कारखानदारी अडचणीत

साखर निर्यातीबाबत महाराष्ट्र शासन, साखर संघ, कारखानदार , वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट केंद्र सरकारवर दबाव आणत नाहीत. आघाडी सरकारमधील अनेक आमदार, मंत्र्यांचे साखर कारखाने असून बरेच मंत्र्यांचे खासगी कारखाने सुद्धा आहेत. वास्तविक ही परिस्थिती मुद्दामहून गांभीर्याने घ्यायची नाही. भविष्यात ऊस उत्पादक तसेच साखर कामगारांचा असंतोष वाढून त्याचा फायदा आपल्यास होईल. तसेच महाराष्ट्रातील विरोधीपक्ष सुद्धा या विषयावर बोलत नाहीत. लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास साखर उद्योग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.