शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:17 IST

महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं.

ठळक मुद्दे कुणी कुणाच्या कचाट्यात नाही. तीन पक्षांची गरज आहे.महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. हे काय टेस्ट ट्युब बेबी नसून बाळ व्यवस्थित जन्माला आलेलं आहे.

पुणेः कुणी कुणाच्या कचाट्यात नाही. तीन पक्षांची गरज आहे, महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं सगळ्यात आधी पवारांनी ठरवलं. हे काय टेस्ट ट्युब बेबी नसून बाळ व्यवस्थित जन्माला आलेलं आहे. त्याला पाळण्यात ठेवलंय अन् बारसंही झालंय, आता त्याचा वाढदिवस होईल, असं म्हणत संजय राऊतांनी महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार म्हणणाऱ्यांना जोरदार चपराक लगावली आहे. लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते.  ते शब्द पाळणार नाहीत याची मला खात्री होती. माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं असंच त्यांनी ठरवलं होतं.  विधानसभेच्या जागावाटपासंबंधांत काही गोष्टी घडत गेल्या. हे नंतर गडबड करणार लक्षात आलं होतं, पण हे चक्र फिरत राहिलं. त्यातून हे सरकार निर्माण झाल्याचा खुलासाही संजय राऊतांनी केला आहे.  शरद पवारांवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे, ठाकरे, पवार यांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव-पगडा आहे, हेच सरकार परिवर्तन घडवू शकतं. या सरकारला कुणी खिचडी सरकार म्हणत नाही, तर लोक सरकार म्हणताहेत. पुलोदची खिचडी म्हणत होते. या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करताहेत आणि सरकारच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. आमच्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे धक्कादायक नव्हते. पहिल्या दिवसापासून आमचं ठरलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हावं. मी सातत्यानं सांगितलं की, आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील. आमच्यासाठी मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नव्हता. ताजच्या 11 तारखेच्या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. अजित पवार आणि फडणवीस यांनी एकत्र सरकार स्थपन केल्यावर आम्हाला फार काही वाटलं नाही. हा फुसका बार आहे हे माहीत होतं. आमच्या गाडीचं चाक नाही, तर ते आमची स्टेपनी घेऊन गेले होते, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला. मुख्यमंत्री हा बॉस असतो आणि तो शिवसेनेचा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातल्या मातीतले पक्ष आहे. आम्हाला आकडा कळत नाही, आम्ही आकडा लावला. प्रत्येक खातं राज्यासाठी महत्त्वाचं असतं. गृह राष्ट्रवादीला दिलं हे आमचंच सरकार आहे. राज्याचा मुख्यमंत्री आमचा आहे, त्यामुळे सर्व खाती आमची आहेत. शिवसेनेनं आपल्याकडे येणारी कुठलीही खाती स्वतःकडे ठेवलेली नाहीत. शरद पवारांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की हे सरकार बनवायचं ते टिकवायचे आणि आदर्श सरकार निर्माण करायचे. आज लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. पूर्ण 5 वर्षे सरकार आम्ही चालवणार आहोत. आता मुलाचं बारसं झालंय. पुढच्या 5 वर्षाचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग करून ठेवलंय. आमची भूमिका ठाम असते. आम्ही करायचं ठरवलंय आणि सरकार चालवणार पडद्या मागच्या गोष्टी पडद्यामागे राहु द्या तर सिनेमा चालू राहील. हे सरकार सुपरहिट सिनेमा आहे. हे सरकार घडवण्यात अनेकांचे सहकार्य आहे. एक कलाकृती घडवताना अनेकांचे योगदान असते. सरकार हा समाजाभिमुख सिनेमा आहे. आम्ही उत्तम कलाकृती निर्माण केली आहे, त्याला तुम्ही हवं ते नाव ठेवा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPuneपुणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी