शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 21:11 IST

गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

पुणे : जे काम करता ते समरस होऊन करा. पण त्यात अडकू नका. आपण जे काम करतो त्यामागे पुष्कळ लोक असतात. आपण करतो तेच चांगले असेल, असे मानू नये. मी केले, मी केले असा अहंकार बाळगण्यात अर्थ नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.               गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकूंद दातार, कार्यवाह, विजया मेहेंदळे, कार्यकारिणी सदस्य वसुधा पाळंदे, मुकूंद कोंढवेकर व मोरेश्वर जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. पाळंदे यांना यावेळी भागवत यांच्या हस्ते पहिला सरस्वतीबाई आपटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

               भागवत म्हणाले, कोणतेही राष्ट्र नीती, सरकार, माणूस किंवा पार्टीवर उभे राहत नाही. समाज जोपर्यंत गीतेचे आचरण करून तसेच बनत नाही, तोपर्यंत अपेक्षित राष्ट्र उभे राहणार नाही. आम्ही संघात सांगतो की, जे करता ते समरस होऊन करा. पण त्यात न अडकू नका. आणीबाणीमध्ये एका शाखेचा प्रचारक असताना खुप काम केले. पण त्यावेळी असे वाटले नव्हते की संघाचे असे दिवस येतील. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. त्यासाठी कर्तव्य करत राहावे. फळ काय मिळेल याचा विचार करू नये.              उग्र माणसे लवकर प्रसिध्द होतात. प्रत्येक विषयावर उगीचच, अधिकार नसताना बोलायचे नसते. ते जमत नसेल तर मौन बाळगावे. पण त्यासाठी भाव शुध्द असावा लागतो. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द नंतर टाकले. पण एका न्यायमुर्ती म्हटले आहे की, हे संविधानात गृहितच धरले आहे. हे शब्द टाकल्याने उघड झाले. भारतवर्षात सर्व विश्व कुटूंब मानण्याची परंपरा आहे. हेच संविधानाचेही रुप आहे. त्याचा उपयोग देश चालविण्यासाठी केला पाहिजे. गीतेमध्ये सांगितलेला धर्म विश्वधर्म आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून चालत आले आहे. त्यानुसार सृष्टी चालणार आहे. कुणी काही केले तरी असेच होणार आहे, असे भागवत यांनी नमुद केले. 

... तर शंभरपट रुपात विश्वगुरू गीतेमध्ये सर्व निरुपण धर्माचे आहे. गीतेनंतर आजतागायत ज्या विचारधारा आल्या, ते सगळे गीतेमध्ये आहे. त्यामुळे गीता अभ्यासली पाहिजे. आचरणात आणली पाहिजे. सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याची तपस्या केली तरी देश आजच्या शंभरपट रुपात विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असे मोहन भागवत यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा