शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 21:11 IST

गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

पुणे : जे काम करता ते समरस होऊन करा. पण त्यात अडकू नका. आपण जे काम करतो त्यामागे पुष्कळ लोक असतात. आपण करतो तेच चांगले असेल, असे मानू नये. मी केले, मी केले असा अहंकार बाळगण्यात अर्थ नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.               गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकूंद दातार, कार्यवाह, विजया मेहेंदळे, कार्यकारिणी सदस्य वसुधा पाळंदे, मुकूंद कोंढवेकर व मोरेश्वर जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. पाळंदे यांना यावेळी भागवत यांच्या हस्ते पहिला सरस्वतीबाई आपटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

               भागवत म्हणाले, कोणतेही राष्ट्र नीती, सरकार, माणूस किंवा पार्टीवर उभे राहत नाही. समाज जोपर्यंत गीतेचे आचरण करून तसेच बनत नाही, तोपर्यंत अपेक्षित राष्ट्र उभे राहणार नाही. आम्ही संघात सांगतो की, जे करता ते समरस होऊन करा. पण त्यात न अडकू नका. आणीबाणीमध्ये एका शाखेचा प्रचारक असताना खुप काम केले. पण त्यावेळी असे वाटले नव्हते की संघाचे असे दिवस येतील. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. त्यासाठी कर्तव्य करत राहावे. फळ काय मिळेल याचा विचार करू नये.              उग्र माणसे लवकर प्रसिध्द होतात. प्रत्येक विषयावर उगीचच, अधिकार नसताना बोलायचे नसते. ते जमत नसेल तर मौन बाळगावे. पण त्यासाठी भाव शुध्द असावा लागतो. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द नंतर टाकले. पण एका न्यायमुर्ती म्हटले आहे की, हे संविधानात गृहितच धरले आहे. हे शब्द टाकल्याने उघड झाले. भारतवर्षात सर्व विश्व कुटूंब मानण्याची परंपरा आहे. हेच संविधानाचेही रुप आहे. त्याचा उपयोग देश चालविण्यासाठी केला पाहिजे. गीतेमध्ये सांगितलेला धर्म विश्वधर्म आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून चालत आले आहे. त्यानुसार सृष्टी चालणार आहे. कुणी काही केले तरी असेच होणार आहे, असे भागवत यांनी नमुद केले. 

... तर शंभरपट रुपात विश्वगुरू गीतेमध्ये सर्व निरुपण धर्माचे आहे. गीतेनंतर आजतागायत ज्या विचारधारा आल्या, ते सगळे गीतेमध्ये आहे. त्यामुळे गीता अभ्यासली पाहिजे. आचरणात आणली पाहिजे. सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याची तपस्या केली तरी देश आजच्या शंभरपट रुपात विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असे मोहन भागवत यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा