शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:44 IST

विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे.

वाघोली : विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे २३ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या सभेत वाघोली ग्रामपंचायतीकडून पुलवामा येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. प्रस्तावित करताना सरपंच वसुधंरा उबाळे यांनी झालेल्या कामाबाबत आणि सुरू असलेल्या कामाबाबतीत माहिती दिली.या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, की १९८१ मध्ये मी बारामतीचा खासदार असताना वाघोली बारामती मतदारसंघात होती. त्यावेळेसच्या वाघोलीची लोकसंख्या कमी होती. आता वाघोली लोकसंख्या एका तालुक्याएवढी झालेली आहे. त्यामुळे वाघोली नगरपालिकेत जाणे गरजेचे आहे. गावच्या लोकसंख्येनुसार गावचा विकास होणे गरजेचे आहे.गावचा विकास करताना कचरा, पाणी समस्या, रस्ते यांसारख्या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज आहे. आता आपण ज्या नदीचे पाणी पितो ते पूर्णपणे दूषित झालेले आहे. त्यावरही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. सगळीकडेच कचरा समस्या ही एक गंबीर समस्या बनत चालली आहे.सगळेच निवडणुका आल्या, की लाखो रुपये खर्च करतात, परंतु नंतर मात्र शांत बसतात. असे न होता सर्वांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पुढील पिढीचा विचार करता कोणीही काही विरोध करो, पण विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पदेखील गरजेचे आहे.आपल्या परिसरातील विकासाचा वेग असाच ठेवायचा असेल तर चांगल्या विचारांच्या लोकांचा विचार आपल्या सर्वांनी करावा लागेल.>मोदीसरकारफक्त आश्वासनदेणारे सरकारआज या सरकारच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्याने तरुण बेरोजगार फिरत आहेत. हे सरकार फक्त आश्वासन देण्याचेच काम करते.एकीकडे अधिवेशनात सहा हजार पोलिसांना इतर सुरक्षा बंदोबस्त मोकळीक देण्यासाठी भाजपा सरकार राज्याचे अधिवेशन थांबवले आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात.>भाजपामध्ये नितीन गडकरींना मदत मिळत नाही,तर सर्वसामान्य माणसाला कशी मदत होणार ?भाजपामध्ये नितीन गडकरीसारख्या माणसाला मदत होत नाही तर सर्वसामान्य माणसाला कोठून मदत होणार, हे सरकार फक्त सुटा-बुटातील सरकार आहे. सरकारने आरक्षणाचे पण पाच वर्षे काहीही केले नाही, आता मात्र काहीतरी केल्याचे दाखवत आहे.शेतकऱ्यांना ५००० वार्षिक म्हणजेच १६ रु.५० रु रोज अनुदान देऊ केले आहे, परंतु आमच्या शेतकऱ्यांना भीक नको आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या. एकीकडे शेतकºयांना पाच हजार वर्षाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये साधूला महिन्याला पाच हजार म्हणजे साठ हजार वर्षाला पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच सर्वच विरोधक आता एकत्र आले आहेत. सर्वांना आता हुकूमशाही सरकार नको आहे.या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, रमेश थोरात, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, वाघोलीच्या सरपंच वसुधंरा उबाळे, उपसरपंच कविता दळवी, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवदास उबाळे, माजी जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार