शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खोदाईमुळे रोज एक वाहिनी तुटतेय, भारनियमनाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:45 IST

शहर पिंपरी-चिंचवडमधील स्थिती : कंत्राटदारांच्या चुकीने वीज ग्राहक वेठीस, महावितरणला लाखो रुपयांचा तोटा

पुणे : गेल्या वर्षभरामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी करण्यात येणाऱ्या खोदकामांमुळे दररोज एकाहून अधिकवेळा भूमिगत वीजवाहिनी तुटत आहे. महावितरणला यामुळे लाखो रुपयांचा तोटा होत असून, ग्राहकांना नाहक मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरात सव्वाचारशे ते साडेचारशे वेळा वीजवाहिनी तुटल्याची माहिती महावितरणमधील अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासन आणि महावितरणमधील विसंवादामुळे भार नियमन नसतानाही स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांना विजेचा लपंडाव पाहावा लागत आहे.

गेल्या वर्षभरात पुणे शहरात विविध कामांसाठी पुणे महानगरपालिका, एमएनजीएल, दूरसंचार देणाºया कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या कंत्राटदारांनी जेसीबी आणि विविध यंत्रांद्वारे केलेल्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या गेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मन:स्ताप पद्मावती विभागातील नागरिकांना झाला आहे. या विभागअंतर्गत पद्मावती, धनकवडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कात्रज, आंबेगाव, गुलटेकडी, भवानी पेठ, गंजपेठ, सहकारनगर, बालाजीनगर असा परिसर येतो. वीजवाहिन्या तोडल्यानंतर महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारी या अनेक पोलीस ठाण्यात अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात येत असल्यामुळे पुढील कारवाईसुद्धा पोलिसांकडून होत नाही. त्यामुळे या कंत्राटदारांचे चांगले फावले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यात खोदकामांना वेग येतो. याच दिवसांत विजेची मागणी अधिक असते. वाहिनी तोडल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी व्यवस्था असूनही वीजपुरवठा सुरू करता येत नाही. तसेच वेळप्रसंगी चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागते. त्यामुळे हजारो वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत होतो. काही प्रकरणांमध्ये महावितरणलाच तोडलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे.खोदकामासाठी परवानगी मिळविल्यानंतर संबंधित विभाग व कंपन्यांचे कंत्राटदार महावितरणला कोणत्याही प्रकारची कल्पना देत नाही. थेट खोदकामास सुरुवात केली जाते. अनेकदा आवाहन करूनही, या स्थितीत बदल होत नाही. दिवसा, रात्री किंवा मध्यरात्रीनंतरही खोदकाम केले जाते. त्यामुळे, केव्हाही वीजवाहिनी तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे.महावितरणचे दुहेरी नुकसानपुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून खोदकामाची परवानगी घेतल्यानंतर संबंधित विभाग अथवा कंत्राटदारांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयास कळविल्यास वीजवाहिन्यांना धोका होणार नाही, याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. मात्र, महावितरणने, अनेकदा सांगूनही खोदकामाबाबत पूर्वसूचना दिली जात नाही. दुर्दैवाने पावसाळापूर्व कामे एप्रिल-मे महिन्यातच होतात. उन्हाळ््यात मागणी जास्त असल्याने भारव्यवस्थापन शक्य होत नाही. परिणामी ग्राहकच नाहक वेठीस धरले जातात. वीजपुरवठा खंडित झाल्यास, खंडित काळातील वीज बिलास महावितरणला मुकावे लागते. हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित असल्याने ते नुकसान लाखोंमध्ये होते. याशिवाय विकत घेतलेल्या विजेचा पुरवठा शंभर टक्के होत नाही. तसेच, प्रत्येक वेळी शंभर टक्के बिलवसुली होत नसल्याने या नुकसानीची तीव्रता आणखी वाढते.

टॅग्स :Puneपुणेelectricityवीज