मध्यवस्तीतही मिळेना, मग उपनगरांतील नागरिकांनी पाण्यासाठी जलसमाधी घ्यायची का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:27+5:302021-06-22T04:08:27+5:30

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार, सोमवार पेठेसह कोंढवा, हडपसर आणि समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी मिळत ...

Even in the middle of nowhere, do the citizens of the suburbs want to take Jalasamadhi for water? | मध्यवस्तीतही मिळेना, मग उपनगरांतील नागरिकांनी पाण्यासाठी जलसमाधी घ्यायची का?

मध्यवस्तीतही मिळेना, मग उपनगरांतील नागरिकांनी पाण्यासाठी जलसमाधी घ्यायची का?

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार, सोमवार पेठेसह कोंढवा, हडपसर आणि समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी मिळत नाही, अशी तक्रार करीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची सूचनाही नगरसेवकांनी मुख्यसभेत केली. जर मध्यवस्तीत पाणी मिळत नसेल तर उपनगरांतील लोकांनी जलसमाधीच घ्यायला हवी, अशा शब्दांत नगरसेवकांनी आपली व्यथा व्यक्त केली.

धरणामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन आणि नियोजनशून्य कारभारामुळे पाणी मिळत नाही. याविषयावर शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, गफूर पठाण, बाबूराव चांदेरे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, सचिन दोडके, मनसेचे वसंत मोरे, हरिदास चरवड, अजय खेडेकर, प्रशांत जगताप आदींनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

पाणी असूनही एक ताससुद्धा पाणी दिले जात नसल्याचे जावळे, धनवडे यांनी निदर्शनास आणून दिले. पाण्याचे वेळापत्रक ठरविण्यात येत नाही. कोंढवा आणि हडपसरसारख्या भागातही पाणी देण्यात येत नाही. यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये पाण्याचे नियोजन नाही. शेतीचे आवर्तन बंद असल्याने कालव्याला पाणी नाही. कालव्याला पाणी सोडले तर विहिरींना पाणी येईल. वारजे-शिवणे परिसरातील नागरिक भारतातील आहेत. पाकिस्तानातून आलेले नाहीत. पाणीपट्टी घ्या, मात्र पाणीसमस्या सोडवा असे नगरसेवक म्हणाले.

उपनगरांतल्या नगरसेवकांनी जलसमाधी घ्यायची का? जिथे मध्यवस्तीत पाणी मिळत नाही, तिथे उपनगरांची अवस्था किती वाईट असेल याची कल्पना न केलेली बरी. कात्रज गाव २४ वर्षांपूर्वी पालिकेच्या हद्दीत आले. मात्र, १९९७ पासून आजवर पाणी याच विषयावर पालिकेशी भांडतोय. साठवण क्षमता वाढविण्यात येत आहे मग नियोजन का होत नाही? टाक्या बांधूनही पाणी मिळत नाहीये. भामा आसखेड, खडकवसल्याचे पाणी मुरतेय कुठे? असा सवाल मोरे केला.

प्रशांत जगताप म्हणाले की, १९९५ पासून पाण्याचा प्रश्न ऐकतोय. पुणे स्मार्ट होत असताना पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. एसआरएच्या मोठ्या इमारतींमध्ये हंड्याने पाणी भरावे लागत आहे. लिफ्ट बंद आहे, मात्र जिन्याने पाणी भरावे लागत आहे. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची आवश्यकता असल्याचे जगताप म्हणाले.

--------------

लवकर सकारात्मक बदल

यावर खुलासा करताना अनिरुद्ध पावसकर यांनी समान पाणीपुरवठा योजनेच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. यासोबतच येत्या काही दिवसांतच मध्यवस्तीसह उपनगरे आणि समाविष्ट गावांमधील पाणीसमस्या सोडविण्याबाबत सकारात्मक बदल दिसतील असे स्पष्ट केले.

Web Title: Even in the middle of nowhere, do the citizens of the suburbs want to take Jalasamadhi for water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.