शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Bhagat Singh Koshyari: सव्वासातशे वर्षानंतरही माऊलींचे विचार समाजासाठी प्रेरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 19:13 IST

माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले

आळंदी : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सव्वासातशे वर्षांनंतर माऊलींच्या विचारांची शिकवण वाढत असून त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यपालांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

''पुज्य ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाच्या दर्शनाचा लाभ झाल्याने धन्य झालो. माऊलींनी चराचरातील लहानमोठ्यांना आईचे ममत्व दाखवले आहे. त्यामुळे आजही त्यांनी केलेला उपदेश समाजात प्रेरक आहे. माऊलींना प्रार्थना करतो की, आपले छत्र संपुर्ण विश्वातील प्राणीमात्रावर असावे. जेणेकरुन माऊलींच्या विचारांवर भागवतधर्म सन्मानाने चालत राहिल असा विचार कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.'' 

त्यानंतर वीणामंडपात सुरू असलेल्या कीर्तनात वीणा गळयात घेऊन त्यांनी माऊलींचा गजर केला. देवस्थानच्या वतीने माऊलींची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ॲड. विकास ढगे - पाटील, आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, उपायुक्त प्रेरणा कट्टे, तहसीलदार वैशाली वाघमारे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, स्वप्नील निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीTempleमंदिर