शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रवेश परीक्षेच्या बनावट गुणपत्रिकेद्वारे मिळवला MBAमध्ये प्रवेश, चार विद्यार्थ्यांवर पुण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 08:56 IST

एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स या संस्थेच्या प्रवेश परीक्षेचीच बनावट गुणपत्रिका देऊन चार विद्यार्थ्यांनी एमबीए़ला प्रवेश घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स या संस्थेच्या प्रवेश परीक्षेचीच बनावट गुणपत्रिका देऊन चार विद्यार्थ्यांनी एमबीए़ला प्रवेश घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चार विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन विद्यार्थी हे झारखंडचे असून एक जण बिहारचा आहे.  अपराजिता राज (रा. बिस्तुपूर कालीमाली, जमशेटपूर), भोमिरा (मुफसिल बिहार, जि. गया), दिव्या सिंग (ग्लोमोरी सिगबम), शैलेश कुमार सिंग (रा. जमशेटपूर) अशी या चौघांची नावे आहेत.याप्रकरणी डॉ. सुरभी प्रवीण जैन यांनी पुणे विद्यापीठाच्या वतीने फिर्याद दिली आहे. याबाबत डॉ. जैन या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक आणि हेड ऑफ डिपार्टमेंट मॅनेजमेंट सायन्सेस या विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहतात. अ‍ेटीएमए (एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स) या परीक्षेद्वारे एमबीएसाठी प्रवेश दिला जातो. २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट या संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सादर करून एमबीएसाठी प्रवेश घेतला.त्यानंतर विद्यापीठाकडून या गुण पत्रिकांची खातरजमा करण्यासाठी त्या अ‍ेटीएमएकडे पाठविण्यात आल्या. तेव्हा त्यांच्याकडून या गुणपत्रिका आम्ही दिलेल्या नसून त्या बनावट असल्याची माहिती देण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पहिले वर्ष संपत असताना विद्यापीठाच्या वतीने या चार विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.