मताचा टक्का वाढविण्यावर असेल प्रशासनाचा भर
By Admin | Updated: September 16, 2014 00:21 IST2014-09-16T00:21:24+5:302014-09-16T00:21:24+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मोहीम हाती घेणार आहे.

मताचा टक्का वाढविण्यावर असेल प्रशासनाचा भर
पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मोहीम हाती घेणार आहे. पथनाटय़, जाहिराती, तसेच शाळा-महाविद्यालये व कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मतदानाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले होते. त्यानंतर लोकसभेत मतदानाची टक्केवारी 57 टक्क्यांवर पोचली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात युवकवर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यांच्यापयर्ंत पोहोचण्यासाठी विविध शिक्षण संस्थांतून मतदार जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या विषयी माहिती देताना अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील म्हणाले, की मतदार नावनोंदणी मोहिमेनंतर आता मताची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेतली
जाईल.
दरम्यान, सोमवारी निवडणूक तयारीसाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय अधिकारी व शाखाप्रमुखांची बैठक झाली. त्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकर, उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, नीलिमा धायगुडे, अस्मिता मोरे, विजया पांगारकर, सीमा होळकर, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. यात निवडणूक तयारीविषयी 19 विषय होते. यात अधिका:यांना नियोजनाच्या विविध जबाबदा:यादेखील देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
शाखाप्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील राजकीय फलक, बॅनर्स उतरवून, त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे व आचारसंहिता कक्षाकडे सादर करावा. तसेच, निवडणूक कामकाजासाठी आवश्यक समित्यांची नियुक्ती करावी. निवडणुकीसाठी सभा, प्रचार वाहन परवाना अशा विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी विधानसभानिहाय एक खिडकी योजना सुरु करण्याची सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.