शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 16:41 IST

मेट्राेचे ब्रेक लावल्यानंतर त्यातून उर्जा निर्माण हाेणार असून त्यातून २५ ते ३० टक्के उर्जेची बचत हाेणार आहे.

पुणे : शहरात जमिनीपासून १८ मीटर उंचीवरून प्रथमच धावणाऱ्या मेट्रो गाडीचे ब्रेक लावले की त्यातून ऊर्जा निर्माण होणार आहे. हीच ऊर्जा मेट्रोला गती देण्यासाठी म्हणून वापरण्यात येणार असून त्यामुळे २५ ते ३० टक्के ऊर्जेची बचत होणार आहे. मेट्रोच्या गाडीसाठी वापरण्यात येणाऱ्या अशा अनेक नवनवीन गोष्टींची माहिती गाडी उत्पादीत करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी गुरुवारी महामेट्रोच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये दिली.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सुनील माथूर, अतूल गाडगीळ, रामनाथ सुब्रम्हण्यम हे महामेट्रोचे वरिष्ठ संचालक तसेच मेट्रोसाठीच्या डब्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी, या कंपनीची भागीदार कंपनी असलेल्या इटलीतील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी कोररडी व अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते. दीक्षित यांनी बैठकीची माहिती देताना सांगितले की टिटागर या भारतीय कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. टिटागर ही इटलीतील कंपनी त्यांची सहयोगी कंपनी आहे. एकूण ३४ ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक ट्रेनला ३ डबे असतील. या सर्व ३४ ट्रेन्सची निविदा किंमत १ हजार १२४ कोटी ९६ लाख इतकी आहे. पहिल्या ८ ट्रेन कंपनीच्या इटलीतील शाखेत, नंतरच्या २६ ट्रेन कोलकाता येथे व नंतरच्या सर्व ट्रेन महामेट्रोच्या नागपूर येथील कारखान्यात तयार करण्यात येणार आहे. सर्व ट्रेन्स वातानुकुलीत असतील. उच्च दर्जाच्या अ‍ॅल्युमिनियम धातूपासून त्या बनवल्या जाणार आहेत. त्यात स्थानकांची माहिती देणारी डिजिटल यंत्रणा असेल. याशिवाय ब्रेक दाबला की त्यातून ऊर्जा निर्माण होऊन ती ट्रेनच्या वर असणाऱ्या वीजवाहक तारांमध्ये पोहचेल. सर्व गाड्यांमध्ये विनामुल्य वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. मेट्रोला सध्या ३ डबे असले तरीही सर्व स्थानके ६ डबे थांबतील अशा आकारांचीच तयार करण्यात येत आहे. 

दीक्षित म्हणाले, स्वारगेट व कात्रज या मार्गाचा प्रकल्प अहवाल महामेट्रोने पालिकेला सादर केला आहे. आता त्यांच्याकडून सादरीकरणासाठी बोलावले जाण्याची प्रतिक्षा आहे. या मार्गासह पुण्यातील सर्व मार्गासाठी आलेल्या प्रस्तावांची एकत्रित माहिती लवकरच राज्य सरकारला देण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटरच्या भूयारी मार्गातील कसबा पेठ येथील मार्ग त्या परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे थोडा बदलण्यात आला. मात्र त्यामुळे महामेट्रोचा फायदाच झाला असून सुमारे ७० मीटरचा मार्ग कमी होऊन जागेसह २०० कोटी रूपयांची बचत झाली. पालिकेने शाळेची जागा दिल्यामुळे हे शक्य झाले व स्थानिक नागरिकांनाही विस्थापीत व्हावे लागले नाही. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो