शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

स्मशानभूमीवरच अतिक्रमण

By admin | Updated: May 4, 2017 01:45 IST

शिरापूर (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामसभेत गाव पुढाऱ्याने स्मशानभूमीवर केलेल्या अतिक्रमामुळे ग्रामसभा वादळी ठरली.

देऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामसभेत गाव पुढाऱ्याने स्मशानभूमीवर केलेल्या अतिक्रमामुळे ग्रामसभा वादळी ठरली. १ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ‘जगणं सोपं पण... मरणं अवघड’ अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी उपस्थित केली.शिरापूर येथील स्मशानभूमीचा गट नंबर १२/२ मध्ये २० गुंठे जागा आहे. परंतु स्मशानभूमीची जागा एका गाव पुढाऱ्यानेच बळकावल्यामुळे येथील ग्रामस्थ त्या जागेसाठी मेटाकुटीला आले आहेत. परंतु पुढारी जागा सोडण्यास तयारच नाही आणि त्याच्याविरोधात तक्रार करण्यास कोणीही तयार होत नाही. गेली कित्येक वर्षे फक्त ग्रामसेभेतच हा विषय चर्चत येतो, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नाही.यापूर्वी त्या जागेत स्मशानभूमी बांधण्यात आली. परंतु स्मशानभूमी बांधल्यानंतर काही दिवसच त्यामध्ये अंत्यविधी होत होते. परंतु त्यानंतर सदर जागा एका पुढाऱ्याते ताब्यात घेऊन सर्व रस्ते बंद केले. त्या २० गुंठे जागेत ऊस पीक लावल्याने स्मशानभूमीमधील शोकाकुलांना अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण झाल्या. पर्यायाने शोकाकुलांना भीमानदी पात्रातच अंत्यविधी करावे लागत आहेत. परिणामी शोकाकुलांची कुचंबणा होत आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या शोकाकुल नातेवाईकांना या ठिकाणी बसायला जागा नाही. त्यामुळे काही ग्रामस्थ आपल्या सोयीनुसार सिद्धटेक (ता. कर्जत) येथे दहावा करतात. या २० गुंठे जागेबाबत दर ग्रामसभेत ठराव तयार होतो. मात्र ग्रामसभा संपल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होत असते. त्यामुळे गावात त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थ बोलत नाहीत. मात्र ती जागा मिळावी यासाठी सर्वच ग्रामस्थ आपआपसात कुजबुज करत असतात. परंतु गाव पुढाऱ्याच्या या अतिदहशतीमुळे ग्रामस्थ त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे धजावत नाहीत व याचाच फायदा हा गावपुढारी घेत आहे. प्रत्येक ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करूनही स्मशानभूमीचा प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडत आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर पुढील काळात ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.यावेळी सरपंच सुलोचना बर्ड, ग्रामसेवक शीतल कापरे, तलाठी फरांदे, मारुती होलम, गोकर्ण खेडकर, अरुण सातव, अशोक जगताप, प्रशांत सांळुखे, मधुकर गोडसे, भरत घोलप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईलग्रामपंचायतीला दोन दिवसांत नोटीस काढून त्या जागेबाबात संबंधिताने केलेले अतिक्रमण काढण्यासाठी सांगण्यात येईल व स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईल. - संतोष हराळे, गटविकास अधिकारी