शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

स्मशानभूमीवरच अतिक्रमण

By admin | Updated: May 4, 2017 01:45 IST

शिरापूर (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामसभेत गाव पुढाऱ्याने स्मशानभूमीवर केलेल्या अतिक्रमामुळे ग्रामसभा वादळी ठरली.

देऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामसभेत गाव पुढाऱ्याने स्मशानभूमीवर केलेल्या अतिक्रमामुळे ग्रामसभा वादळी ठरली. १ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ‘जगणं सोपं पण... मरणं अवघड’ अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी उपस्थित केली.शिरापूर येथील स्मशानभूमीचा गट नंबर १२/२ मध्ये २० गुंठे जागा आहे. परंतु स्मशानभूमीची जागा एका गाव पुढाऱ्यानेच बळकावल्यामुळे येथील ग्रामस्थ त्या जागेसाठी मेटाकुटीला आले आहेत. परंतु पुढारी जागा सोडण्यास तयारच नाही आणि त्याच्याविरोधात तक्रार करण्यास कोणीही तयार होत नाही. गेली कित्येक वर्षे फक्त ग्रामसेभेतच हा विषय चर्चत येतो, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नाही.यापूर्वी त्या जागेत स्मशानभूमी बांधण्यात आली. परंतु स्मशानभूमी बांधल्यानंतर काही दिवसच त्यामध्ये अंत्यविधी होत होते. परंतु त्यानंतर सदर जागा एका पुढाऱ्याते ताब्यात घेऊन सर्व रस्ते बंद केले. त्या २० गुंठे जागेत ऊस पीक लावल्याने स्मशानभूमीमधील शोकाकुलांना अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण झाल्या. पर्यायाने शोकाकुलांना भीमानदी पात्रातच अंत्यविधी करावे लागत आहेत. परिणामी शोकाकुलांची कुचंबणा होत आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या शोकाकुल नातेवाईकांना या ठिकाणी बसायला जागा नाही. त्यामुळे काही ग्रामस्थ आपल्या सोयीनुसार सिद्धटेक (ता. कर्जत) येथे दहावा करतात. या २० गुंठे जागेबाबत दर ग्रामसभेत ठराव तयार होतो. मात्र ग्रामसभा संपल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होत असते. त्यामुळे गावात त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थ बोलत नाहीत. मात्र ती जागा मिळावी यासाठी सर्वच ग्रामस्थ आपआपसात कुजबुज करत असतात. परंतु गाव पुढाऱ्याच्या या अतिदहशतीमुळे ग्रामस्थ त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे धजावत नाहीत व याचाच फायदा हा गावपुढारी घेत आहे. प्रत्येक ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करूनही स्मशानभूमीचा प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडत आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर पुढील काळात ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.यावेळी सरपंच सुलोचना बर्ड, ग्रामसेवक शीतल कापरे, तलाठी फरांदे, मारुती होलम, गोकर्ण खेडकर, अरुण सातव, अशोक जगताप, प्रशांत सांळुखे, मधुकर गोडसे, भरत घोलप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईलग्रामपंचायतीला दोन दिवसांत नोटीस काढून त्या जागेबाबात संबंधिताने केलेले अतिक्रमण काढण्यासाठी सांगण्यात येईल व स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईल. - संतोष हराळे, गटविकास अधिकारी