शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

स्मशानभूमीवरच अतिक्रमण

By admin | Updated: May 4, 2017 01:45 IST

शिरापूर (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामसभेत गाव पुढाऱ्याने स्मशानभूमीवर केलेल्या अतिक्रमामुळे ग्रामसभा वादळी ठरली.

देऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) येथे झालेल्या ग्रामसभेत गाव पुढाऱ्याने स्मशानभूमीवर केलेल्या अतिक्रमामुळे ग्रामसभा वादळी ठरली. १ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ‘जगणं सोपं पण... मरणं अवघड’ अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी उपस्थित केली.शिरापूर येथील स्मशानभूमीचा गट नंबर १२/२ मध्ये २० गुंठे जागा आहे. परंतु स्मशानभूमीची जागा एका गाव पुढाऱ्यानेच बळकावल्यामुळे येथील ग्रामस्थ त्या जागेसाठी मेटाकुटीला आले आहेत. परंतु पुढारी जागा सोडण्यास तयारच नाही आणि त्याच्याविरोधात तक्रार करण्यास कोणीही तयार होत नाही. गेली कित्येक वर्षे फक्त ग्रामसेभेतच हा विषय चर्चत येतो, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नाही.यापूर्वी त्या जागेत स्मशानभूमी बांधण्यात आली. परंतु स्मशानभूमी बांधल्यानंतर काही दिवसच त्यामध्ये अंत्यविधी होत होते. परंतु त्यानंतर सदर जागा एका पुढाऱ्याते ताब्यात घेऊन सर्व रस्ते बंद केले. त्या २० गुंठे जागेत ऊस पीक लावल्याने स्मशानभूमीमधील शोकाकुलांना अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण झाल्या. पर्यायाने शोकाकुलांना भीमानदी पात्रातच अंत्यविधी करावे लागत आहेत. परिणामी शोकाकुलांची कुचंबणा होत आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या शोकाकुल नातेवाईकांना या ठिकाणी बसायला जागा नाही. त्यामुळे काही ग्रामस्थ आपल्या सोयीनुसार सिद्धटेक (ता. कर्जत) येथे दहावा करतात. या २० गुंठे जागेबाबत दर ग्रामसभेत ठराव तयार होतो. मात्र ग्रामसभा संपल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होत असते. त्यामुळे गावात त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थ बोलत नाहीत. मात्र ती जागा मिळावी यासाठी सर्वच ग्रामस्थ आपआपसात कुजबुज करत असतात. परंतु गाव पुढाऱ्याच्या या अतिदहशतीमुळे ग्रामस्थ त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे धजावत नाहीत व याचाच फायदा हा गावपुढारी घेत आहे. प्रत्येक ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करूनही स्मशानभूमीचा प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडत आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर पुढील काळात ग्रामस्थांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.यावेळी सरपंच सुलोचना बर्ड, ग्रामसेवक शीतल कापरे, तलाठी फरांदे, मारुती होलम, गोकर्ण खेडकर, अरुण सातव, अशोक जगताप, प्रशांत सांळुखे, मधुकर गोडसे, भरत घोलप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईलग्रामपंचायतीला दोन दिवसांत नोटीस काढून त्या जागेबाबात संबंधिताने केलेले अतिक्रमण काढण्यासाठी सांगण्यात येईल व स्मशानभूमीची जागा मोकळी केली जाईल. - संतोष हराळे, गटविकास अधिकारी